शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे १३२ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

लाॅकडाऊन काळात वीज मीटर रिडिंग घेण्यासाठी येणारे कर्मचारी नसल्याने नागरिकांनी मोबाईलमध्ये रिडिंग घेऊन ते पाठवण्याची सूचना केली होती. परंतु ...

लाॅकडाऊन काळात वीज मीटर रिडिंग घेण्यासाठी येणारे कर्मचारी नसल्याने नागरिकांनी मोबाईलमध्ये रिडिंग घेऊन ते पाठवण्याची सूचना केली होती. परंतु या योजनेत केवळ १० टक्केच नागरिकांनी सहभाग घेतल्याने मार्च महिन्यापासून थकबाकीचे आकडे वाढण्यास सुरुवात झाली होती. यातून फेब्रुवारी महिन्यापर्यंत वीज ग्राहकांकडे थकीत असलेल्या २२ कोटींची रक्कम थेट १३२ काेटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही वसुली येत्या काळात कशी होणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. घरगुती वीजबिलांची रक्कम वाढल्याने नागरिकांकडून त्याचा भरणा करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. यातून वीज कंपनीचे कर्मचारी व ग्राहक यांच्यातील वाद टळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून येत्या काळात वसुली मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकीकडे घरगुती वीजबिलांची रक्कम वाढत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील ५५ हजार ५०७ कृषिपंप ग्राहकांकडे ७४५ कोटी ३१ लाख रुपयांची एकूण थकबाकी असल्याची माहिती दिली गेली आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे २५८ कोटी ८० लाख माफ केले गेले आहेत. शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या ४८६ कोटी ५१ लाख रुपयांच्या रकमेतही ५० टक्के सूट देण्यात आली आहे. परंतु या उपक्रमालाही शेतकरी फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती वीज कंपनीतील सुत्रांकडून देण्यात आली आहे.