शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नंदुरबार जिल्ह्यातील 1,316 विद्यार्थी शाळेपासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

नंदुरबार : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणासाठी गेल्या महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत १,३१६ विद्यार्थी शाळाबाह्य आढळले. यात सर्वाधिक विद्यार्थी हे धडगाव ...

नंदुरबार : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणासाठी गेल्या महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत १,३१६ विद्यार्थी शाळाबाह्य आढळले. यात सर्वाधिक विद्यार्थी हे धडगाव तालुक्यात आढळून आले आहेत. या विद्यार्थ्यांना आता शाळेत दाखल करण्यासाठी व शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी गेल्या महिन्याभरात विशेष मोहिम राबविण्यात आली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मणुष्यबळाचीही नियुक्ती करण्यात आली होती. ऐकुण ९६ पथके त्यासाठी नियुक्त करण्यात आली होती. नंदुरबार तालुक्यात सर्वात कमी तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्णांचा त्यात समावेश आहे. सहा ते १४ वयोगटातील बालकांचे याद्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते. या बालकांना आता शाळेत दाखल करून घेण्यासाठी मोहिम राबवावी लागणार आहे.

३० मुलं बालकामगार म्हणून कार्यरत...

n सर्वेक्षणात ३० मुलं ही बालकामगार म्हणून कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबार या बालकामगारांमध्ये नंदुरबार तालुक्यात दोन तर तळोदा तालुक्यात २८ जणांचा समावेश आहे. तळोदा तालुक्यात सापडलेले सर्वाधिक बालकामगार हे वीटभट्टी व अन्य कामांवर होते.

n गरजाधिष्ठीत असलेल्या बालकांची संख्येमध्ये नंदुरबार तालुक्यात चार, नवापूर तालुक्यात आठ, शहादा तालुक्यात नऊ, तळोदा तालुक्यात चार, अक्कलकुवा तालुक्यात नऊ तर धडगाव तालुक्यात एका मुलाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण शाळाबाह्य अधीक

n शाळाबाह्य मुलांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात ११ मुले तर सहा मुली, नवापूर तालुक्यात ३५ मुले तर २६ मुली, शहादा तालुक्यात ३८ मुल तर ५० मुली, तळोदा तालुक्यात ३४ मुलं तर ४० मुली. अक्कलकुवा तालुक्यात ६२ मुुुलं तर १०७ मुली आणि धडगाव तालुक्यात ४०९ मुल तर ५०८ मुलींचा समावेश आहे.

n याशिवाय मजुरीसाठी परजिल्ह्यात, परगावी गेलेल्या कुटूंबांच्या मुुलांची संख्या देखील वेगळी आहे. त्यांची नावे शाळेत आहेत, परंतु ते शाळेत जात नाहीत अशी स्थिती आहे.

शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणार...

सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या शाळाबाह्य मुलांना आता शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष मोहिम देखील आखावी लागणार आहे. सर्व्हेक्षणात या बालकांचा संपुर्ण पत्ता घेण्यात आल्याने त्यांना आता त्या त्या भागातील शाळेत दाखल करून घेण्यात येणार आहे.