शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अधोगतीकडे नेणाऱ्यांना युवकांनी जागा दाखवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:19 IST

देशात युवकांना, युवकांया संघटनांना बोलण्यावर बंदी घातली जात आहे. अनेक युवक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. मतदान करण्याचा अधिकार संविधानाने दिला असला तरी तो अधिकार हिरावूृन घेण्याचा प्रयत्न शासन करीत आहे.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : नवमतदारांशी साधला संवाद, रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची स्वीकारली जबाबदारी

नांदेड : देशात युवकांना, युवकांया संघटनांना बोलण्यावर बंदी घातली जात आहे. अनेक युवक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. मतदान करण्याचा अधिकार संविधानाने दिला असला तरी तो अधिकार हिरावूृन घेण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणा-या तरुणांनी आपले पवित्र मतदान योग्य पात्रात टाकून देशाला अधोगतीकडे नेणा-या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.नांदेडमध्ये शनिवारी खा. चव्हाण यांनी तरुणांशी संवाद साधला. आज नांदेडचे तरुण पुणे, मुंबईला जावून नोकरी करीत आहेत. त्यांना नांदेडमध्येच रोजगार मिळावा ही आपली भूमिका आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी एसईझेड आणले. परंतु, भाजपा उमेदवाराने एमआयडीसीच्या भूसंपादनात अडथळे निर्माण करुन स्थानिक तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले. नांदेडचे उद्योग विस्तारिकरण होऊ न देण्यास भाजपा उमेदवार जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.ब्रिटिश शासनाने देश लुटला. आता पुन्हा एकदा मोदी आणि शहा देश लुटत आहेत. हा देश धर्मनिरपेक्ष आहे. मात्र धर्मांधता वाढीस लावण्याचे कामही केले जात आहे. भाजपाच्या काळात सरकारच्या विरुद्ध बोलणे म्हणजे देशद्रोह समजला जात आहे. निवडून दिलेले सरकार तुमचे-आमचे म्हणणे ऐकणारे असले पाहिजे, यासाठी युवकांनी मताचे पवित्र दान योग्य पात्रात टाकावे, असे सांगताना ‘वुई विल कम बॅक इन पॉवर’ अशा शब्दात चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. यावर तरुणांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. एकमेकांना शिव्या देणारे सेना-भाजप आज गळ्यात गळे घालून मते मागत आहेत. त्यांना उमेदवारही दुसºया पक्षातून घ्यावा लागत आहे. दुसरीकडे निवडणूक रिंगणात उतरलेली वंचित बहुजन आघाडी भाजपाचीच ‘बी’ टीम असल्याची टीका चव्हाण यांनी केली.युवकांनी रोजगारासह, विकासाच्या अनुषंगाने विचारलेल्या विविध विषयांवरील प्रश्नांना अशोकराव चव्हाण यांनी दिलखुलास उत्तरे दिली.या कार्यक्रमात शिवानी पाटील यांनी इंग्रजी, मराठी व हिंदीमधून राजकीय स्थितीविषयी उपस्थित नवमतदारांना प्रोजेक्टरद्वारे विस्तृत माहिती दिली. शहर व जिल्ह्यातील युवकांच्या मोठ्या संख्येमुळे हा संवाद उपक्रम वैशिष्टयपुर्ण ठरला.मुली म्हणाल्या पप्पांना नांदेडच्या विकासाचा ध्यासप्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचा ‘युवकांशी संवाद’ या कार्यक्रमासाठी त्यांच्या कन्या श्रीजया आणि सुजया यांनी पुढाकार घेतला. युवा पिढीला एकत्रित आणले. यावेळी चव्हाण यांनी तरुणाईपुढे मनमोकळ्या गप्पा मारल्या. श्रीजया चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. खा. चव्हाण हे जनतेसाठी १८ तास काम करतात. विकासासाठी मतदारांनी त्यांना ताकद देण्याची गरज असल्याचे सांगितले. सुजया चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी जे काही चांगले करणे शक्य आहे ते केले जात आहे. आजचा युवावर्ग भूलथापांना बळी पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला. समाजामध्ये चांगले काय आणि वाईट काय? याची युवा पिढीला चांगलीच समज आहे. असे सांगताना ‘हाऊज् द जोश’ याचा प्रत्यय या कार्यक्रमात आल्याचे सुजया यांनी सांगितले.रोजगारनिर्मितीची जबाबदारी माझीया कार्यक्रमात संवाद साधताना तरुणांनो, तुम्हाला मला निराश बघायचे नाही. तुम्हाला मी पकोडा विकण्याचा सल्ला देणार नाही, असे चव्हाण म्हणाले. भारत आता बेरोजगार युवकांचा देश बनला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी रोजगार निर्मितीची जबाबदारी मी घेईल. तुम्ही निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण