शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

नांदेड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्याने घेतला १४ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 18:52 IST

पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तसेच विजा कोसळून प्रत्येकी ७ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात १३८ जनावरांचाही घेतला बळी

- सदानंद गजभारे

हदगाव : यंदा जिल्हाभरात दमदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले असतानाच पावसाने जिल्ह्यातील चौदा जणांचा बळीही घेतला आहे. यातील सात जण पुरात वाहून जावून मरण पावले. तर सात जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. जनावरांनाही पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून, पावसाळ्यात तब्बल १३६ जनावरे विविध कारणाने मृत्युमुखी पडली आहेत.

जून महिन्यातच जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे आलेल्या पुराने हदगाव तालुक्यातील धानोरा येथील संतोष मारोतराव कदम (४१) यांचा १९ जुलै रोजी वाहून जावून मृत्यू झाला. याच महिन्यात २० जुलै रोजी देगलूर तालुक्यातील हानेगाव येथील हानमंत गोविंद मोरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात हिमायतनगर तालुक्यातील वडगाव जता येथील भागाजी जाधव तर देगलूर तालुक्यातील टाकळी येथील रामदास मलागर या दोघांचा १७ ऑगस्ट रोजी पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. 

तर मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील चंद्रकांत बोधणे यांचाही पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातीलच माधव डोरनाळे हा ३३ वर्षीय तरुण २८ सप्टेंबर रोजी मृत्युमुखी पडला. तर ११ ऑक्टोबर रोजी किनवट तालुक्यातील खांबाळा येथील सचिन चव्हाण या २३ वर्षीय तरुणाचा पुराच्या पाण्याने जीव घेतला.

पुराप्रमाणेच जिल्ह्यात सात जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यामध्ये कंधार तालुक्यातील हरबळ येथील २६ वर्षीय महिला हिमायतनगर तालुक्यातील सरसरम येथील ५० वर्षीय पुरुष, किनवट तालुक्यातील निचपुर येथील ३५ वर्षीय पुरुष, कंधार तालुक्यातील गौळ येथील ५० वर्षीय पुरुष, बिलोली तालुक्यातील लघुळ येथील १६ वर्षीय तरुण आणि कंधार तालुक्यातील औराळ येथील एका पुरुषाचा ११ ऑक्टोबर रोजी अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला.

जिल्ह्यात १३८ जनावरांचाही घेतला बळीपशुसंवर्धन विभागाने ६० हजार जनावरांचे लसीकरण केल्याने लंपी स्कीन आजार काहीसा नियंत्रणात आला. दुसरीकडे पावसाळ्यात जिल्ह्यात तब्बल १३६ जनावरे मृत्युमुखी पडली असून, यात सर्वाधिक ३३ जनावरे मुखेड तालुक्यातील आहेत. तर कंधार ३४, लोहा तालुका २१, उमरी आणि नांदेड तालुक्यात प्रत्येक ७, धर्माबाद ९, देगलूर ६, अर्धापूर, किनवट आणि मुदखेड तालुक्यात प्रत्येकी ३, बिलोली २, तर भोकर, नायगाव, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात प्रत्येकी एका जनावराचा पाण्यात वाहून जावून तसेच विजा कोसळून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडRainपाऊस