शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नांदेड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्याने घेतला १४ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 18:52 IST

पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तसेच विजा कोसळून प्रत्येकी ७ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात १३८ जनावरांचाही घेतला बळी

- सदानंद गजभारे

हदगाव : यंदा जिल्हाभरात दमदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले असतानाच पावसाने जिल्ह्यातील चौदा जणांचा बळीही घेतला आहे. यातील सात जण पुरात वाहून जावून मरण पावले. तर सात जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. जनावरांनाही पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून, पावसाळ्यात तब्बल १३६ जनावरे विविध कारणाने मृत्युमुखी पडली आहेत.

जून महिन्यातच जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे आलेल्या पुराने हदगाव तालुक्यातील धानोरा येथील संतोष मारोतराव कदम (४१) यांचा १९ जुलै रोजी वाहून जावून मृत्यू झाला. याच महिन्यात २० जुलै रोजी देगलूर तालुक्यातील हानेगाव येथील हानमंत गोविंद मोरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात हिमायतनगर तालुक्यातील वडगाव जता येथील भागाजी जाधव तर देगलूर तालुक्यातील टाकळी येथील रामदास मलागर या दोघांचा १७ ऑगस्ट रोजी पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. 

तर मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील चंद्रकांत बोधणे यांचाही पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातीलच माधव डोरनाळे हा ३३ वर्षीय तरुण २८ सप्टेंबर रोजी मृत्युमुखी पडला. तर ११ ऑक्टोबर रोजी किनवट तालुक्यातील खांबाळा येथील सचिन चव्हाण या २३ वर्षीय तरुणाचा पुराच्या पाण्याने जीव घेतला.

पुराप्रमाणेच जिल्ह्यात सात जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यामध्ये कंधार तालुक्यातील हरबळ येथील २६ वर्षीय महिला हिमायतनगर तालुक्यातील सरसरम येथील ५० वर्षीय पुरुष, किनवट तालुक्यातील निचपुर येथील ३५ वर्षीय पुरुष, कंधार तालुक्यातील गौळ येथील ५० वर्षीय पुरुष, बिलोली तालुक्यातील लघुळ येथील १६ वर्षीय तरुण आणि कंधार तालुक्यातील औराळ येथील एका पुरुषाचा ११ ऑक्टोबर रोजी अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला.

जिल्ह्यात १३८ जनावरांचाही घेतला बळीपशुसंवर्धन विभागाने ६० हजार जनावरांचे लसीकरण केल्याने लंपी स्कीन आजार काहीसा नियंत्रणात आला. दुसरीकडे पावसाळ्यात जिल्ह्यात तब्बल १३६ जनावरे मृत्युमुखी पडली असून, यात सर्वाधिक ३३ जनावरे मुखेड तालुक्यातील आहेत. तर कंधार ३४, लोहा तालुका २१, उमरी आणि नांदेड तालुक्यात प्रत्येक ७, धर्माबाद ९, देगलूर ६, अर्धापूर, किनवट आणि मुदखेड तालुक्यात प्रत्येकी ३, बिलोली २, तर भोकर, नायगाव, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात प्रत्येकी एका जनावराचा पाण्यात वाहून जावून तसेच विजा कोसळून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडRainपाऊस