शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चिंताजनक ! मिसरुड न फुटलेल्यांच्या हाती कट्टा; गल्लीबोळात तयार झाल्या गँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:50 IST

टोळी प्रमुख जेलमध्ये मात्र टोळीतील अल्पवयीन मुले मात्र अजूनही देशी कट्टे दाखवून खंडणी वसुली, लुटमार करीत आहेत.

नांदेड : एकेकाळी सहजपणे तलवारी मिळण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या नांदेडात आता तेवढ्याच सहजपणे काही हजारात देशी कट्टे मिळत आहेत. मध्यप्रदेशातून अकोला मार्गे जिल्ह्यात येणारी ही हत्यारे मिसरुड न फुटलेल्या मुलांच्या हाती पडल्यानंतर ते भल्या-भल्यांना खंडणीसाठी धमकावत आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या टोळ्यातील प्रमुख गजाआड असले तरी, त्यांचे कच्चे-बच्चे मात्र हैदोस घालत आहेत. रेकॉर्डवर त्यांची नोंद नसल्यामुळे पोलीसही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.

२०१९ या वर्षात जिल्ह्यात कुख्यात आणि खलिस्तानी चळवळीचा समर्थक असलेल्या हरविंदरसिंग रिंदाची दहशत होती. वैयक्तिक दुश्मनीतून त्याचे माळी परिवाराशी बिनसले होते. त्यावेळी महिनाभराच्या काळातच भरदिवसा गोळीबार करून तिघांचा खून करण्यात आला होता. तसेच रिंदाने शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन कोट्यवधींची खंडणी ही वसूल केली. विशेष म्हणजे खंडणी वसुलीच्या या धंद्यात स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यानेही त्याला साथ दिली. आता दिघोरे आणि रिंदाच्या टोळीतील जवळपास १५ जण तुरुंगात आहेत. त्यानंतर विक्की चव्हाण आणि विक्की ठाकूर यांच्यामध्ये खंडणी वसुलीच्या हद्दीवरून टोळीयुद्ध पेटले होते. त्यात अगोदर कामठा रस्त्यावर विक्की चव्हाणचे अपहरण करून हाल-बेहाल करून मारण्यात आले. त्याचा बदला घेण्यासाठी विक्की ठाकूरचा गाडीपुरा भागात खून करण्यात आला.

या दोन्ही गँगच्या वादातून शहरात अनेकवेळा गोळीबार झाला. न्यायालयातही या दोन्ही टोळ्या पोलिसांसमोरच आपसात भिडल्या होत्या, हे विशेष. पोलिसांनी या दोन्ही टोळीतील ३० हून अधिक जणांना अटक केली. त्यामुळे काही काळ शहरात शांतता होती. तोच कैलास बिगानिया टोळीने तोंड वर काढले. या टोळीने अगोदरच्या सर्व गँगची जागा भरून काढण्याच्या प्रयत्नात खंडणीसाठी धमकावण्याचा सपाटाच सुरू केला होता. ही टोळीही सध्या तुरुंगात आहे. परंतु टोळीतील अल्पवयीन मुले मात्र अजूनही देशी कट्टे दाखवून खंडणी वसुली, लुटमार करीत आहेत. दोन महिन्यापूर्वीच बाफना भागात जिनिंगचे ५० लाख लांबविण्यात आले होते.

गुन्हेगारी टोळ्यांवर लावला अंकुशजिल्ह्यातील रिंदा, विक्की चव्हाण, विक्की ठाकूर, कैलाश बिगानिया टोळीतील ५० हून अधिक आरोपी सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यापैकी काही जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी खंडणीसाठी फोन आल्यास न घाबरता गोपनीय तक्रार करावी, असे आवाहन विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे.

शारदानगर भागात तीन खूनबांधकाम व्यावसायिक संजय बियाणी राहत असलेल्या शारदा नगर भागात मागील काही दिवसांत खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून घरात घुसून तरुणाची हत्या करण्यात आली. पाठलाग करून एका तरुणाचा मित्रांनी खून केला, तर दोन दिवसांपूर्वी बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड