शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

हॉर्न वाजवून, इमर्जन्सी ब्रेक लावले तरीही वाचू शकले नाहीत मजूर; जाणून घ्या कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 17:06 IST

कोणतीही गाडी सिंग्नलनूसार धावत असते़ लाल रंगाचे सिंग्नल दिलेले असेल तर गाडी एअरब्रेकच्या आधारे थांबविण्याचे काम लोकोपायलट करीत असतो़ परंतु, हिरवे सिंग्नल असेल तर गाडीचे ब्रेक लावले जावू शकत नाही़ 

ठळक मुद्देविभागीय रेल्वे व्यवस्थापकासह अधिकारी, डॉक्टर घटनास्थळीराज्य पोलिस करतेय अपघाताचा तपास इमर्जन्सी ब्रेकनंतरही विशेष अंतरावर थांबते रेल्वे

- श्रीनिवास भोसले

नांदेड : हैदराबाद येथून मनमाडकडे जाणाऱ्या मालगाडीच्या खाली चिरडून पंधरा मजूरांचा मृत्यू झाला़ हे सर्व मजूर रेल्वे पटरीवर झोपलेले होते़ ही बाब लोकोपायलट अन् गार्डच्या लक्षात आली़ त्यानंतर त्याने हॉर्न वाजवून इमर्जन्सी ब्रेकही दाबले़ परंतु, ब्रेकींग डिस्टन्स न मिळाल्याने रूळावर झोपलेले मजूर चिरडल्या गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांना ‘लोकमत’ला दिली़

जालना येथील कंपनीत काम करणारे उत्तरप्रदेशातील मजूर लॉकडाऊनमुळे रेल्वे पटरीने आपल्या गावी निघाले होते़ परंतु, त्यांच्यावर शुक्रवारी पहाटे काळाने त्यांच्यावर घाला घातला़ अपघाताची माहिती मिळताच दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक उपिंदर सिंग आणि त्यांच्या सर्व टिमने घटनास्थळाकडे धाव घेतली़ यासंदर्भात विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सटाणा शिवारात झालेल्या मालगाडी अपघातात १४ मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे़ तर दवाखान्यात घेवून जाताना दोन मजुरांचा मृत्यू झाला, एका जखमीस औरंगाबादच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ घटनास्थळी राज्य पोलिस दलाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी तत्काळ हजर झाले असून पुढील तपास राज्य पोलिस करीत असल्याचे उपिंदर सिंग यांनी सांगितले़

अपघात झालेली गाडी हैदराबादकडून मनमाडकडे जात होती़ गाडीमध्ये कोणताही माल नव्हता़ पटरीवर काहीतरी असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने तत्काळ हॉर्न वाजवून इमर्जन्सी ब्रेकही लावले़ परंतु,  आवश्यक ब्रेकींग डिस्टन्सच्या अगोदर गाडी थांबू शकत नाही़ त्यामुळे रेल्वे रूळावर झोपलेले मजूर  गाडी थांबण्याच्या स्थितीत असताना चिरडून मरण पावले, असा प्राथमिक अंदाज असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी सांगितले़  इतर  मजूर हे ट्रॅकच्या बाजूला झोपले होते़ त्यामुळे त्यांचा प्राण वाचला़ हा आत्महत्येचा प्रयत्न वाटत नाही़ अन्यथा इतर लोकांचाही मृत्यू झाला असता़ त्यामुळे हा अपघातच असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असल्याचेही सिंग यांनी सांगितले़ या घटनेचा तपास राज्य पोलीस करीत असून इतर सविस्तर माहिती तपासाअंती पुढे येईल, असे त्यांनी सांगितले़

इमर्जन्सी ब्रेकनंतरही विशेष अंतरावर थांबते रेल्वेमालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमधील वजनानूसार त्या गाड्या ठराविक स्पीडने धावतात़ परंतु, आपत्कालिन परिस्थितीमध्ये गाडीसमोर कोणी आले, पटरी अथवा गाडीत काही खराबी आढळून आल्यास लोकोपायलट इमर्जन्सी ब्रेक लावू शकतो़ परंतु, इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतरही गाडी ८०० ते १२०० मिटर अंतरावर जावून थांबते़  सदर घटनेत रूळावर काही तरी आहे हे लक्षात आल्यानंतर लोकोपायलटने ब्रेक लावले़ पण, आवश्यक अंतर (ब्रेकिंग डिस्टन्स) न मिळाल्यानेच १५ मजूरांचा चिरडून मृत्यू झाल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे़

अपघातग्रस्त गाडी धावत होती रिकामी़़़अत्यावश्यक वस्तू अन्नधान्य, खते, बियाणे, कोळसा, भाजीपाला, दुध, शेतमाल यासह जीवनावश्यक वस्तू घेवून भारतीय रेल्वेमध्ये मालवाहतूक सेवा सुरू आहे़ याकरीता सर्व रेल्वे स्थानकावरील आणि नियंत्रण कार्यालयातील कामकाजही सुरू आहे़ दरम्यान, अपघातग्रस्त रेल्वे हैदराबादकडून मनमाडकडे रिकामी कशासाठी धावत होती, ही बाब तपासानंतरच पुढे येईल़  

लोकोपायलट ब्रेक कधी लावू शकतो?कोणतीही गाडी सिंग्नलनूसार धावत असते़ लाल रंगाचे सिंग्नल दिलेले असेल तर गाडी एअरब्रेकच्या आधारे थांबविण्याचे काम लोकोपायलट करीत असतो़ परंतु, हिरवे सिंग्नल असेल तर गाडीचे ब्रेक लावले जावू शकत नाही़ त्यात जर गाडीच्या गार्डने लाल झेंडी दाखविली तर लोकोपायलट ब्रेक लावू शकतो़ तसेच आपत्कालिन परिस्थितीत ब्रेक लावण्याचा अधिकारदेखील लोकोपायलटला असतो़

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादNandedनांदेड