शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने साखरेचे भाव पडले; एफआरपी जाहीर, पण एमएसपी जैसे थे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 19:49 IST

राज्यात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होते. तर सदर साखर इतर देशांत निर्यात करण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानगी दिली जाते.

नांदेड : दरवर्षी महाराष्ट्र राज्यासह देशभरातून लाखो क्विंटल साखर दुसऱ्या देशांत निर्यात केली जाते; पण या हंगामात केंद्र सरकारने साखर कारखानदारांना देण्यात येणारा एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने राज्यात साखरेचे भाव पडले आहेत. ३६ ते ३७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचलेले साखरेचे भाव आजघडीला ३३.६० रुपयांवर येऊन ठेपले आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होते. तर सदर साखर इतर देशांत निर्यात करण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानगी दिली जाते. परंतु, यावर्षी साखरेची निर्यात करण्यासाठी सरकारने राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना निर्यातीसाठी परवानाच दिला नाही. त्याचा परिणाम मागील वर्षी कारखान्याकडे असलेला साखरेचा मुबलक साठा तसेच यावर्षी होणारे उत्पन्न असा दोन वर्षांचा साखरेचा साठा असणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होऊनही निर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे बाजारात साखरेचे भाव उतरल्यामुळे राज्य आणि देशातील साखर कारखानदारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे.

यावर्षी एमएसपी ‘जैसे थे’दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन उसासाठी देण्यात येणारा एफआरपी जाहीर करण्यात येतो. यावर्षीही उसाचा एफआरपी जाहीर करण्यात आला आहे. परंतु, कारखान्यासाठी केंद्र शासनाने यंदा एमएसपी जाहीर केलाच नाही. त्यामुळे कारखानदारांसाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

उत्पादन वाढले अन् मागणी कमीराज्यात गतवर्षीचा लाखो क्विंटल साखरेचा साठा कारखान्याकडे पडून आहे. शिवाय यावर्षीचा हंगाम सुरू झाला असून, मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होणार आहे. उत्पादित केलेल्या साखरेची निर्यात केल्यास बाजारातील दर कायम राहतात. परंतु, यावर्षी निर्यातीसाठी बंदी घातल्याने उत्पादन वाढूनही मागणी घटल्याने लाखो क्विंटल साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी