शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पिवळ्या सोन्यापुढे पांढरे सोने पडले फिके; कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: April 12, 2024 14:53 IST

शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे.

नांदेड : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाचे भाव यावर्षी साडेसात हजारांपर्यंतच स्थिरावलेले आहेत. असे असताना पिवळ्या सोन्याने मात्र गगनभरारी घेतली असून भाव झपाट्याने वाढले. आजघडीला नांदेडच्याबाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर मिळताहेत. त्यामुळे पिवळ्या सोन्यापुढे शेतकऱ्यांचे पांढरे सोने मात्र फिके पडल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे आभूषण म्हणून सोन्याला महिला अधिक पसंती देतात. गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी केली जाते. दिवसेंदिवस दर वाढत असले तरी सोन्याची उलाढाल काही कमी झालेली नाही. एकेकाळी प्रतितोळे सोने आणि प्रतिक्विंटल कापसाचे भाव सारखेच होते. पण, कालांतराने सोन्याचे भाव वाढत गेले अन् कापसाचे भाव अनेक वर्ष स्थिरावलेलेच राहिले.

नांदेड जिल्ह्यात २०१० मध्ये कापसाचे भाव दोन हजार रुपये इतके होते. तर सोन्याचे भाव १६,५०० रुपये होते. पण मागील १५ वर्षांतच कापसाचे भाव तीन पटीने तर सोन्याचे भाव साडेचार पटीने वाढल्याचे पाहायला मिळते. २०१२ मध्ये कापसाचे भाव ३,१०० रुपये तर सोन्याचे भाव २८ हजारांवर पोहोचले होते. यावरून मागील दहा वर्षांत कापसापेक्षा सोन्याचे भाव अधिक पटीने आणि झपाट्याने वाढल्याने सोने खरेदी सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातील तफावत वाढत गेली आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत गेली. जेवढा कापूस अधिक तेवढ्या आत्महत्या अधिक असे चित्र राज्यात दिसू लागले.

कापसाचे भाव निम्यावरचकापसाला मागील तीन वर्षांपूर्वी १३ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला होता.मात्र, त्यानंतर दरवर्षी कापसाचे भाव उतरत गेले आणि सध्या साडेसात हजारांहून अधिक दर वाढले नाहीत. त्या तुलनेत सोन्याच्या दराने मात्र मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे तीन वर्षांत कापसाचे भाव वाढण्याऐवजी निम्यावरच आले आहेत.

कापसाचा उताराही घटलाजिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड व नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवंडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. अनेक शेतकऱ्यांना एका बॅगला तीन ते चार क्विंटलच कापूस निघत असल्याने त्यांनी लागवडीसाठी टाकलेला खर्चही पदरातून करावा लागला आहे.

काही राज्यात एमएसपीपेक्षा जादा दरकेंद्र शासनाने काही राज्यात एमएसपीपेक्षा ३० ते ४० टक्के दर अधिक जाहीर केले आहेत.पण, सध्या कापसाला मिळत असलेला दर केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमसपीपेक्षा कमी आहे.दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव १३ हजारावर गेले होते.पण,यंदा सात ते साडेसात हजारांतच कापूस विक्री करावा लागतो आहे.

१९७२ ला होता ३२० रुपये भाव१९७२ मध्ये चांगल्या दर्जाच्या कापसाला ३२० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव होता. त्यानंतर कापसाचा दर एक हजार रुपयापर्यंत होण्यासाठी १८ वर्षांचा कालावधी लागला. १९९१-९२ मध्ये प्रतिक्विंटल १,१३४ रुपयांचा भाव मिळाला होता. तर १९१९ मध्ये ५,५५० रुपये इतका होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांत मात्र, दोन हजार रुपये इतकेच दर वाढले. उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यातील निव्वळ नफा तुलनेने कमीच असल्यामुळे मराठवाड्यासह राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :NandedनांदेडcottonकापूसGoldसोनंAgriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार