शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कंधार तालुका कुपोषणमुक्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:48 IST

तालुक्यात मार्च २०१९ च्या अहवालानुसार १० विभागांत अद्याप वयानुसार तीव्र कमी वजनाची १९३ बालके आहेत. सर्वात कमी संख्या पेठवडज - बारूळ या दोन विभागांत आहे. तर सर्वात जास्त संख्या उस्माननगर विभागात आहे.

कंधार : तालुक्यात मार्च २०१९ च्या अहवालानुसार १० विभागांत अद्याप वयानुसार तीव्र कमी वजनाची १९३ बालके आहेत. सर्वात कमी संख्या पेठवडज - बारूळ या दोन विभागांत आहे. तर सर्वात जास्त संख्या उस्माननगर विभागात आहे. तालुका कुपोषण मुक्त कधी होणार? असा प्रश्न पालक व नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.तालुक्यात शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या २० हजार ४७२ एवढी आहे. यातील १६ हजार ८६७ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यात साधारण श्रेणीत १५ हजार ८०० बालके आली. मध्यम तीव्र वजनाचे बालक ८७४ संख्या आढळली. परंतु तीव्र कमी कमी वजनाची बालकसंख्या १९३ समोर आली. त्यामुळे कुपोषणमुक्तीला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वप्राथमिक शिक्षण, नानाविध उपक्रम, जनजागृती, प्रबोधन, आरोग्य, आहार आदींच्या माध्यमातून कुपोषणमुक्तीचा प्रयत्न होतो. तरीही ते साध्य होत नाही.तालुक्यातील १० विभागांचा मार्च महिन्याचा अहवाल समोर आला आहे. त्यात वयानुसार तीव्र कमी वजनाच्या सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या उस्माननगर विभागात ३६ आहे. शेकापूर २९, कुरूळा २७, पानशेवडी २३, दिग्रस १७, रूई १६, चिखली १६, पानभोसी १४ अशी संख्या आहे. सर्वात कमी संख्या पेठवडज ७ व बारूळ ८ अशी आहे. उंचीनुसार तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या ३६ आहे. त्यात सर्वाधिक संख्या दिग्रस विभागात १३, कुरूळा ११, शेकापूर ४, उस्माननगर ४, चिखली २, रूई १, पानशेवडी १ आणि पानभोसी, पेठवडज व बारूळ विभागात एकही बालक नाही.

  • आॅक्टोबर २०१७ मध्ये ३३७ बालके कुपोषित होती. जानेवारी २०१८ मध्ये २७० तर नोव्हेंबर २०१८ मध्ये २२६ बालके दहा विभागांत कुपोषित होती. मार्च २०१९ मध्ये १९३ बालके वयानुसार तीव्र कमी वजनाचे असल्याचे समोर आले. कुपोषित बालकांची संख्या घटली आहे. परंतु कुपोषणमुक्ती समूळ कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला. पथनाट्य, पोषण आहार सप्ताह, रॅली, जनजागृती आदी करूनही कुपोषणमुक्ती होत नाही. साहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडेच गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी पदाचा पदभार आहे. पंचायत समिती व बालविकास प्रकल्प कार्यालयाची कामे त्यांना मोठी करताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्नHealthआरोग्य