शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कधी संपणार व्यथा वडार समाजाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:11 IST

विज्ञान-तंत्रज्ञान युगात मानव चंद्रावर मार्गक्रमण करत असताना, देशप्रगतीच्या विकासाच्या वल्गना करत असताना मात्र दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हाती हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणा-या वडार समाजाच्या व्यथा मात्र त्यांच्या जन्मालाच पुजलेल्या आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होतो़

कुरुळा : विज्ञान-तंत्रज्ञान युगात मानव चंद्रावर मार्गक्रमण करत असताना, देशप्रगतीच्या विकासाच्या वल्गना करत असताना मात्र दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हाती हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणा-या वडार समाजाच्या व्यथा मात्र त्यांच्या जन्मालाच पुजलेल्या आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होतो़सध्या सगळीकडे सूर्य आग ओकत आहे. तापमानाने आतापर्यंतचा उच्चांक मोडला आहे़ ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. उष्माघाताने शेकडो लोक आपला जीव गमावत आहेत. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लोक कुलर, एसी लावून बसत आहेत़ मात्र वडार समाजाच्या बांधवांना मात्र टीचभर पोटाच्या खळगीसाठी ना उष्णतेचा विचार ना उष्माघात़ कारण रोज खडी फोडल्याशिवाय रात्रीची रोजीरोटी मिळत नाही़ म्हणून अशा उष्णतेच्या लाटेतसुद्धा त्यांना काम करावे लागत आहे.कुरूळा ते नंदनशिवनी रस्त्याचे काम सुरु असून त्या ठिकाणी हे वडारबांधव भर उन्हात खडी फोडत आहेत. कोण त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडेल? ना शासन ना मिळते रेशन, सामाजिक बांधिलकीतून खरंच या समाजाच्या व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. त्यांंच्या या व्यथा कुठेतरी थांबल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. एकूणच वडार समाजाची अजूनही अधोगती होत असल्याचे चित्र उपरोक्त प्रकारावरून दिसून येते़ शासनस्तरावर याकडे लक्ष देणे आवश्यक आहे़

दहाव्या वर्षांपासून काममी १० वर्षांचा होतो तेव्हापासून हा व्यवसाय करत आहे़ माझी बायको सावित्री हीसुद्धा खडी फोडण्याचे काम करते़ आम्हाला शेतीबिती नाही. यावरच आमची रोजीरोटी आहे. यावर्षीचा कडक उन्हाळा आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघितला़ हाताला कपडा बांधून काम करावे लागते- किशन खोबराजी मंजीलवाड, (रा़ मौजे खुड्याचीवाडी, ता. कंधार, जि.नांदेड)

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक