शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बेनाळ परिसरात गव्हाचे पीक बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोहा-सध्या थंडीचा ज्वर वाढला असल्याने गहू ,हरभरा या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोहा-सध्या थंडीचा ज्वर वाढला असल्याने गहू ,हरभरा या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोहा शहरातील बेनाळ परिसरातील पीक बहरले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

लोहा शहरातील बेनाळ परिसरात यंदा परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. दरम्यान पावसामुळे या भागातील विहिरी ,तलाव ,नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली आहे .पाणी पातळीत वाढ झाल्याने सिंचनाचा आधार असलेल्या शेतकऱ्यांनी गहू पेरणीस प्राधान्य दिले.

सध्या मुबलक पाणी व पोषक वातावरणामुळे गव्हाचे पीक चांगले बहरात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

परतीच्या जोरदार पावसामुळे लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. तलावातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाले. या पाण्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी गहू ,हरभरा या पिकाची पेरणी केली आहे.परंतु लिंबोटी धरणाच्या एकूण किती पाणी पाळ्या आहेत हे अद्यापही कळाले नाही. यामुळे येत्या चार आठ दिवसात पाणी न सुटल्यास भरलेले बहरलेली पिके वाळून जातात की काय ? असे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.