शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाण्यासाठी दाहीदिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:19 IST

सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाल्याने येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा प्रश्न दाहक होणार आहे़ या पार्श्वभूमीवर गावागावांतून टँकरसह अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़

ठळक मुद्देजिल्हा परिषद : २ हजार ८२७ उपाययोजना हाती

नांदेड : सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाल्याने येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा प्रश्न दाहक होणार आहे़ या पार्श्वभूमीवर गावागावांतून टँकरसह अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़ जिल्हा परिषद प्रशासनानेही पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना हाती घेतल्या असून जिल्ह्यातील १६ तालुक्यांत २ हजार ८२७ उपाययोजनांची कामे करण्यात येणार आहेत़जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९५५ मि़मी़ इतके आहे़ मात्र पावसाने मागील वर्षी सरासरीही गाठली नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील देगलूर, उमरी, मुखेडसह अन्य तालुक्यांना येणाºया काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे़ नांदेड शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया विष्णूपुरी प्रकल्पातही केवळ दोन महिने पुरेल एवढे पाणी आहे़ त्यात वरच्या भागातून नांदेडसाठी पाणी येण्याची आशाही मावळली आहे़ दिग्रस बंधाºयात राखीव ठेवण्यात आलेले पाणी उचलण्यात आले असून आगामी काळात शहरावरही भीषण टंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे़ या पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत़तसेच ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेनेही ६८ कोटी २२ लाख रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर २०१७ ते जून २०१८ या कालावधीत २७ कोटी १४ लाख ६१ हजार रुपयांचा निधी तीन टप्प्यात जिल्हा परिषदेला मिळाला होता़यामधून जिल्ह्यातील १६ तालुक्यात २ हजार ८२७ उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत़ यात नळयोजनेची दुरुस्ती, इंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिर घेणे, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीर अधिग्रहण व विहिरींचे खोलीकरण यासह गाळ काढणे या उपाययोजना करण्यात आल्या आहेत़या उपाययोजनावर झालेल्या खर्चाचा निधी संबंधित पंचायत समित्यांना यापूर्वीच पाठविण्यात आला आहे़ दरम्यान, शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीगळतीही मोठ्या प्रमाणात होत आहे़ आगामी काळात बाष्पीभवनाचा मुद्दाही मोठा आहे़ त्यात आतापासूनच शहरालगत असलेल्या वाढीव परिसराला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ वाडी, पावडेवाडी, काबरानगर, विशालनगर, यशनगरी यासह इतर भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ या परिसरातील बोअरही आटले असून नळयोजनेद्वारे मिळणारे पाणी अपुरे पडत आहे़ त्यामुळे नागरिकांना पैसे खर्च करुन पाणी विकत घ्यावे लागत आहे़ यामध्ये टँकरमाफियांची मात्र दिवाळी होत आहे़अनेक तालुक्यांनी गाठली नव्हती पावसाची सरासरीजिल्ह्याची वार्षिक सरासरी ९५५़५४ एवढी आहे़ मागील पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या ८०़९५ टक्के इतका पाऊस झाला आहे़ यात मुखेड तालुक्यात ५८़६९, नायगाव-६६़९७, धर्माबाद-७३़८३, बिलोली-५८़३०, देगलूर-३९़८० तर किनवट तालुक्यात ६६़२७ मि़मी़इतका पाऊस झालेला असल्याने या सर्व तालुक्यांना येणा-या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो़ भोकर आणि मुदखेड या दोन तालुक्यातच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता़शहराची तहान भागविण्या-या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या मोजकाच जलसाठा उपलब्ध आहे़ यापूर्वी विष्णूपुरीतून शेतक-यांसाठी एक पाणीपाळी देण्यात आली होती़ त्यात शेतक-यांनी विष्णूपुरीतून शेतीसाठी आणखी पाणी पाळ्या सोडण्याची मागणी केली आहे़ त्यामुळे हा विषय आता गंभीर झाला आहे़ या पाणीप्रश्नावर आता राजकारण केले जात आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाNanded zpनांदेड जिल्हा परिषद