शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

रमजान महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:01 IST

मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास ६ मेपासून सुरुवात होत आहे. हा पवित्र महिना ऐन उन्हाळ्यात आल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा.

ठळक मुद्देमाजी महापौरांच्या मागणीने महापालिका प्रशासनाची धावपळ

नांदेड : मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास ६ मेपासून सुरुवात होत आहे. हा पवित्र महिना ऐन उन्हाळ्यात आल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा. तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी केली आहे.एकीकडे शहरातील विशेषत: दक्षिण नांदेडातीलपाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु आहे. विष्णूपुरीत दिवसागणिक जलसाठा कमी होत आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणीपुरवठा कसा करायचा याबाबत चिंतन केले जात आहे.माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी २९ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देत रमजान महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व प्रभागांतील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील मशीद, मंदिर व इतर प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी असलेली दिवाबत्ती सुव्यवस्थित ठेवावी, अशी सूचना केली आहे. बंद असलेले पथदिवे बदलून तातडीने नवीन एलईडी बसवावेत जेणेकरुन रात्रीच्यावेळी प्रार्थनेसाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही.रमजान महिन्यात स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रार्थनास्थळ परिसरात दैनंदिन स्वच्छता प्राधान्याने करावी. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.माजी महापौर सत्तार यांनी केलेल्या मागण्यांमधील पाणीपुरवठ्याची मागणी वगळता इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी मनपा प्रशासनाला अडचण येणार नाही. पण एक दिवसाआड पाणीपुरवठा कसा करायचा ? हा प्रश्न आहे. आजघडीला तीन दिवसांआड पाणी दिले जात आहे. विष्णूपुरीत पाणी घेण्यासाठी पर्यायी प्रकल्पही कोरडे पडले आहेत.दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलाविली आहे. जायकवाडीतून पाणी घेणे शक्य नाही. तर लोअर दुधनाचा विचार केला असता या प्रकल्पातील साठाही मृतसाठ्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शहरवासियांना द्यावे लागणार आहे.

  • मुस्लिम बांधवासाठी रमजान महिना पवित्र असतो. शहरात आज तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. विष्णूपुरीतील पाणी कमी झाले असले तरी इसापूर प्रकल्पातून सांगवी बंधा-यात पाणी घेतले जात आहे. हे पाणी दक्षिण नांदेडलाही देता येणे शक्य आहे. प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्यास हा विषय मार्गी लागू शकतो, अशी प्रतिक्रिया माजी महापौर सत्तार यांनी दिली.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाwater transportजलवाहतूक