शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

हदगाव शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा;  उन्हाळ्याआधीच पाणीटंचाईच्या झळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:43 IST

उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच  शहराला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. शहरातील काही प्रभागात नळाला पाच दिवसांआड पाणी येत असल्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत़

ठळक मुद्देइसापूर धरणामध्ये केवळ १३ टक्के पाणीसाठा नदीकाठच्या विहिरी, बोअर जानेवारीमध्येच  कोरडे

हदगाव (नांदेड ) : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच  शहराला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. शहरातील काही प्रभागात नळाला पाच दिवसांआड पाणी येत असल्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत.

इसापूर धरणामध्ये केवळ १३ टक्के साठा आहे़ नदीकाठच्या विहिरी, बोअर जानेवारीमध्येच कोरड्या पडल्या़ हदगाव शहरातील पाणीपुरवठा करण्यासाठी कोथळा नदीवर विहीर व बोअरची व्यवस्था करण्यात आली़ तरीही पाणीटंचाई आटोक्यात येत नसल्याने नदीवर तात्पुरता बंधारा बांधण्यात आला़ शहरातील बहुतांश हातपंप बंद आहेत़ 

शहरातील एका मुस्लिम सामाजिक संस्थेने ३० ते ३५ बोअर घेवून दिले़ त्यात विद्युतपंपही टाकले़ मात्र वीजजोडणीचे कोटेशन कोणी भरावे? पुन्हा येणारे बिल कोणी भरावे? या कारणावरून नगरपालिका अडचणीत सापडली़ शहरात नळजोडणीची संख्या ७०० ते ८०० आहे़ एकाच नावावर तीन-तीन कुटुंब मोटर लावून पाणी घेत असल्याने खालच्या बाजूस असलेल्या गल्ली-मोहल्ल्यामध्ये पाणीच जात नाही़ २०१० मध्ये टाकलेली पाईपलाईनही ब्लॉक झाल्याने अंतिम भागात पाणीही जात नाही़ 

शहराला शुद्ध पाणी देण्याचा प्रकल्प पाच वर्षांपासून रखडला आहे़ तो पुन्हा प्रस्तावित केला असून मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याचे बालाजी राठोड यांनी सांगितले़ पाण्याचीच व्यवस्था नाहीतर शुद्ध पाणीपुरवठा कसा करणार? असा सवाल बांधकाम सभापती विद्याताई भोसकर यांनी केला़ नगरपालिकेत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्नही चर्चिला गेला नाही़ त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत़ पाण्यासाठी नगरसेवकांना धारेवर धरले आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी