शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

पाच दिवस दररोज पाणीपुरवठा

By admin | Updated: October 21, 2014 13:31 IST

महापालिकेने दिवाळी सणानिमित्त २१ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात मुबलक पाणी असल्यामुळे एकदिवसआड पाणी सोडण्यात येत आहे.

नांदेड : महापालिकेने दिवाळी सणानिमित्त २१ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात मुबलक पाणी असल्यामुळे एकदिवसआड पाणी सोडण्यात येत आहे. दसरा व बकरी ईदनिमित्त दररोज पाणी सोडण्यात आल्याने दिवाळीलाही दररोज पाणी सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. 
सध्या सणोत्सवाचे दिवस असून २१ ऑक्टोबरपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. यावेळेस पाच दिवसांचा दिपावली उत्सव असल्याने दररोज पाणी सोडण्याची भूमिका मनपाने घेतली आहे. विष्णूपुरी प्रकल्पात १00 टक्के साठा असल्याने शहराला एक दिवसआड पाणी सोडण्यात येते. मात्र सणानिमित्त दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, पाणी -पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. 
यंदा पाऊस ५0 टक्केच झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे आहे. विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. मनपाला पुढील पावसाळ्यापर्यंत या पाण्यावरच नियोजन करावे लागणार आहे. शहरात सध्या एक दिवसआड पाणी सोडण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात मात्र दररोज पाणी सोडण्यात येत आहे. असे असले तरी नागरिकांनी पाण्याची बचत करून अपव्यय टाळावा, असे आवाहन मनपाच्या वतीने केले आहे. 
दरम्यान, शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी असलेले हातपंप पूर्णपणे बंद पडले आहेत. तर काही ठिकाणी पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत असल्याचे पहावयास मिळत आहे. मनपा प्रशासनाने बंद पडलेले बोअर, हातपंप सुरु केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तशी मागणीही नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)