शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पाच दिवस दररोज पाणीपुरवठा

By admin | Updated: October 21, 2014 13:31 IST

महापालिकेने दिवाळी सणानिमित्त २१ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात मुबलक पाणी असल्यामुळे एकदिवसआड पाणी सोडण्यात येत आहे.

नांदेड : महापालिकेने दिवाळी सणानिमित्त २१ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात मुबलक पाणी असल्यामुळे एकदिवसआड पाणी सोडण्यात येत आहे. दसरा व बकरी ईदनिमित्त दररोज पाणी सोडण्यात आल्याने दिवाळीलाही दररोज पाणी सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. 
सध्या सणोत्सवाचे दिवस असून २१ ऑक्टोबरपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. यावेळेस पाच दिवसांचा दिपावली उत्सव असल्याने दररोज पाणी सोडण्याची भूमिका मनपाने घेतली आहे. विष्णूपुरी प्रकल्पात १00 टक्के साठा असल्याने शहराला एक दिवसआड पाणी सोडण्यात येते. मात्र सणानिमित्त दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, पाणी -पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. 
यंदा पाऊस ५0 टक्केच झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे आहे. विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. मनपाला पुढील पावसाळ्यापर्यंत या पाण्यावरच नियोजन करावे लागणार आहे. शहरात सध्या एक दिवसआड पाणी सोडण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात मात्र दररोज पाणी सोडण्यात येत आहे. असे असले तरी नागरिकांनी पाण्याची बचत करून अपव्यय टाळावा, असे आवाहन मनपाच्या वतीने केले आहे. 
दरम्यान, शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी असलेले हातपंप पूर्णपणे बंद पडले आहेत. तर काही ठिकाणी पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत असल्याचे पहावयास मिळत आहे. मनपा प्रशासनाने बंद पडलेले बोअर, हातपंप सुरु केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तशी मागणीही नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)