शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

मानार प्रकल्प परिसरात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:41 IST

ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाई सुरु झाल्याने राहटी व वरवंट येथील ग्रामपंचायतच्या वतीने उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराहटी, वरवंट गावांतील विहिरींचे पाणी आटले, पाणी सोडण्याची मागणी

बारूळ : मानार प्रकल्प परिसरातील पाच किमी अंतरावरील राहटी, वरवंट या गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी पूर्णत: आटल्या असून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाई सुरु झाल्याने राहटी व वरवंट येथील ग्रामपंचायतच्या वतीने उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.बारुळ मानार प्रकल्पात १४६ दलघमी जलसाठ्याची क्षमता असून या प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. तसेच कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यांतील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. आजघडीला या प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा असून हे पाणी पिण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी यांनी आरक्षित केले आहे.बारुळ, वरवंट, राहटी येथील ग्रामस्थांनी मानार प्रकल्प पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाºयांना या प्रकल्पासाठी आमची घरे, जमिनी गेल्या असून त्यामुळे प्रकल्पातील पाणी आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला आरक्षित करुन द्यावे, अशी मागणी वारंवार केली; पण त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही.वरवंट, राहटी या गावांतील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन मानार प्रकल्प उपविभागीय कार्यालय बारुळ, जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार यांना निवेदनाद्वारे केली. मात्र प्रशासनाने कालव्याद्वारे पाणी सोडल्याने ग्रामस्थ जाब विचारण्यासाठी प्रकल्प व पाटबंधारे विभागाकडे गेले असता अनुचित प्रकार घडू नये म्हणून उस्माननगर पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात केला होता. एकंदरीत या भागातील पाणीप्रश्न पेटल्याचे चित्र दिसून आले. उजव्या कालव्यात त्वरित पाणी न सोडल्यास ग्रामस्थांच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.ग्रामस्थांचा गेट उचलण्याचा प्रयत्न, पोलीस बंदोबस्त मागविला

वरवंट,राहटी या गावांतील पाणीपुरवठा विहिरी आटल्या म्हणून नागरिकांनी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र प्रकल्पातील संपूर्ण पाणी आरक्षित आहे. पाणी सोडण्यासाठी जि. प. विभागाची परवानगी घेऊन सोडण्यात येईल. या दोन्ही गावांतील काही नागरिक गेट उचलण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आल्यामुळे पोलीस बंदोबस्त मागविला होता. -आर. जी. कु-हेकर, उपविभागीय अधिकारी, बारुळ ,मानार प्रकल्प़या प्रकल्पासाठी आमच्या जमिनी, घरे गेली. त्याच प्रकल्पातून पाणी मिळण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. नागरिक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. येत्या चार दिवसांत उजव्या कालव्यात पाणी न सोडल्यास अख्खे गाव उपोषणास बसणार आहे.- शिवराज बारसे, सरपंच राहटी

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई