शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरावरील जलसंकट आणखी तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:24 IST

लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे.

ठळक मुद्देपाऊस लांबला : सिद्धेश्वरमधून सोडण्यात आलेले पाणी होणार दोन दिवसांत बंद

नांदेड : लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे. सिद्धेश्वर धरणाच्या मृत जलसाठ्यातून जवळपास १४ दलघमी पाणी नांदेडसाठी कॅनालद्वारे घेण्यात आले. यातील २.७० दलघमी पाणी आजघडीला उपलब्ध झाले आहे. सिद्धेश्वरमधून सोडण्यात येणारे पाणी दोन दिवसांत बंदच होणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याकडे दुर्लक्ष केल्याने नांदेड शहरावर पहिल्यांदाच भीषण जलसंकट ओढवले आहे. शहरात आजघडीला ८ ते १० दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी शहरवासियांची भटकंती सुरुच आहे. विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडल्यानंतर सिद्धेश्वर धरणातून नांदेडसाठी १५ दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ९ जून रोजी कॅनालमार्गे पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. जवळपास महिनाभर हे पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत सिद्धेश्वर धरणातून १४ दलघमी पाणी सोडण्यात आले. १४ जून रोजी विष्णूपुरी प्रकल्पात पाणी पोहोचले. कॅनालमार्गे घेण्यात आलेल्या पाण्यापैकी गळती आणि बाष्पीभवन, पाणीचोरी पाहता विष्णूपुरी प्रकल्पात २.७० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. अजूनही विष्णूपुरी प्रकल्प मृतसाठ्यातच आहे. सिद्धेश्वरमधून आलेल्या पाण्यातून विष्णूपुरीत प्रतिदिन १ ते अर्धा इंच पाणी वाढत गेले. त्यामुळे नांदेडकरांची तहान आजघडीला भागत आहे. पण सिद्धेश्वरमधील मृतजलसाठाही आता कमी झाल्याने सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेले पाणी दोन दिवसांत बंद होणार आहे.जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत केवळ ९ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची प्रतीक्षा आतुरतेने केली जात आहे. उपलब्ध जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत. पाणीटंचाईची भीषण परिस्थिती पाहता योग्य नियोजनाची गरज असल्याचे ते म्हणाले. माळी यांनी सोमवारी विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील कोटीतीर्थ विद्युत पंपास भेट दिली. सिद्धेश्वर धरणातून उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे पाणी उपसा करुन जॅकवेल विहिरीत पाणी घेण्यासाठी लावण्यात आलेले १२ पैकी ९ पंप बंद करण्यात आले होते. हे पंप सुरु ठेवण्याची तयारी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, कार्यकारी अभियंता गिरीष कदम, उपअभियंता संघरत्न सोनसळे यांची उपस्थिती होती.दरम्यान, विष्णूपुरी प्रकल्पात उपलब्ध झालेला जलसाठ्याचे संरक्षण करण्याची गरज आहे. अवैध उपसा होऊ नये यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दहा पथकांची मंगळवारी आयुक्तांनी बैठक बोलाविली आहे. पथकप्रमुखांना पाण्याच्या संरक्षणाबाबत योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहेत.आता सातव्या दिवशी मिळणार पाणीमहापालिकेने पाणीटंचाईमुळे शहरात पाचव्या दिवशी पाणी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. यातही अनेक तांत्रिक बाबीमुळे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पाऊस लांबल्याने शहरवासियांची चिंता आणखी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्तांनी विष्णूपुरी प्रकल्पासह कोटीतीर्थ प्रकल्पाची पाहणी केली. शहरावरील जलसंकट पाहता आता शहराला पाचव्याऐवजी सातव्या दिवशी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त माळी यांनी सांगितले. शहरवासियांनी जलसंकट पाहता उपलब्ध पाणी जपून आणि काळजीने वापरणे आवश्यक आहे. पाणी वाया घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाvishnupuri damविष्णुपुरी धरण