शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

बिलोली तालुक्यात तीव्र पाणीटंचाई सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:45 IST

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट ‘एप्रिल हिट’ने नागरिक बेजार तापमानवाढीने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न

बिलोली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेळ्या, मेंढ्या तसेच दूध उत्पादकांना फटका बसत आहे. गुरांसह बकऱ्यांच्या चा-याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिल हिटने नागरिक पुरते बेजार झाले आहेत. तापमानवाढीमुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेलीपालन, पशुपालनावर चालतात. शेलीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात मुख्यालयी असणारे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने उपचाराअभावी जनावरे दगावू लागली आहेत. अधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पाणीटंचाईमुळे इतर तालुक्यातीलही मेंढपाळांचे कळप चाºयाच्या शोधार्थ दाखल झाले आहेत. तालुक्यातील अनेक ठिकाणचे तलाव, विहिरी, कूपनलिका, नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.पाण्यासाठी नागरिकांचीही पायपीट पहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘एप्रिल हिट’ ने नागरिक पुरते बेजार झाल्याचे दिसून येत आहे. आतापासून मे महिन्यातील तापमानाची शक्यता नागरिक वर्तवित आहेत. त्यामुळे पुढे आणखी परिस्थिती बिघडणार, अशी शक्यता आहे.अघोषित भारनियमनउन्हाळ्यात सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी नागरिक घरोघरी गारवा मिळविण्यासाठी कुलर लावतात. मात्र, गरज असताना बत्ती गुल होत आहे. रात्रीही पहाटे वीज खंडित होते. अघोषित भारनियमनामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील हिंगणी येथील नागरिकांना पाणी असूनही मिळेनासे झाले आहे. येथील हनुमान मंदिरालगत असलेली पाण्याची मोटार एका महिन्यात तीन वेळा नादुरुस्त झाल्याने गत बारा दिवसांपर्वीपासून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ मात्र याकडे संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. आता लोकसभा निवडणुका संपल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई