शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

बिलोली तालुक्यात तीव्र पाणीटंचाई सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:45 IST

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट ‘एप्रिल हिट’ने नागरिक बेजार तापमानवाढीने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न

बिलोली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेळ्या, मेंढ्या तसेच दूध उत्पादकांना फटका बसत आहे. गुरांसह बकऱ्यांच्या चा-याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिल हिटने नागरिक पुरते बेजार झाले आहेत. तापमानवाढीमुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेलीपालन, पशुपालनावर चालतात. शेलीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात मुख्यालयी असणारे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने उपचाराअभावी जनावरे दगावू लागली आहेत. अधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पाणीटंचाईमुळे इतर तालुक्यातीलही मेंढपाळांचे कळप चाºयाच्या शोधार्थ दाखल झाले आहेत. तालुक्यातील अनेक ठिकाणचे तलाव, विहिरी, कूपनलिका, नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.पाण्यासाठी नागरिकांचीही पायपीट पहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘एप्रिल हिट’ ने नागरिक पुरते बेजार झाल्याचे दिसून येत आहे. आतापासून मे महिन्यातील तापमानाची शक्यता नागरिक वर्तवित आहेत. त्यामुळे पुढे आणखी परिस्थिती बिघडणार, अशी शक्यता आहे.अघोषित भारनियमनउन्हाळ्यात सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी नागरिक घरोघरी गारवा मिळविण्यासाठी कुलर लावतात. मात्र, गरज असताना बत्ती गुल होत आहे. रात्रीही पहाटे वीज खंडित होते. अघोषित भारनियमनामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील हिंगणी येथील नागरिकांना पाणी असूनही मिळेनासे झाले आहे. येथील हनुमान मंदिरालगत असलेली पाण्याची मोटार एका महिन्यात तीन वेळा नादुरुस्त झाल्याने गत बारा दिवसांपर्वीपासून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ मात्र याकडे संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. आता लोकसभा निवडणुका संपल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई