शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी चुनाल नाल्यावर होणार मलशुद्धीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:51 IST

पर्यावरण विभागाकडून १७ कोटी ५९ लाखांचा निधी

ठळक मुद्देमहापालिकेचा २० टक्के रक्कमेचा वाटा राहणार आहे.धार्मिकदृष्ट्या महत्व असलेल्या गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न

नांदेड : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत चुनालनाला येथे मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून या कामासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने १७ कोटी ५९ लाख ८१ हजार रुपये मंजूर केले आहेत. यात महापालिकेचा २० टक्के रक्कमेचा वाटा राहणार आहे.

ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाबाबत गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे. महापालिकेने गोदावरी प्रदुषण रोखण्यासाठी १२ वर्षापूर्वी योजना आखली होती. शहरातून वाहणारे १९ नाल्यांचे पाणी थेट गोदावरीत न जाता हे पाणी पाईपलाईनद्वारे देगलूरनाका येथे आणि पुढे बोंढार येथे मलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत नेण्यात आले होते. या योजनेतील अनेक त्रुटीमुळे ही योजना निश्चितच उपयुक्त ठरली नाही. परिणामी आजही गोदावरी नदीचे प्रदुषण कायम होत आहे.  याबाबत अनेक संघटना, राजकीय पक्ष संताप व्यक्त करीत आहेत. 

त्यातच नांदेडचे पालकमंत्री पद राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे आल्यामुळे या गोदावरी प्रदुषणाकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. पालकमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर गोदावरीचे झालेले एकूण प्रदुषण पाहता पर्यावरण विभागाने तत्कालीन महापौर आणि आयुक्तावरही गुन्हे दाखल केले आहेत. पुढे गोदावरी शुद्धीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला. प्रारंभी या आराखड्याला राज्यशासनाकडून मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे तो नव्याने तयार करण्यात आला होता. पालकमंत्री कदम यांनी लक्ष दिल्यानंतर नांदेड महापालिकेला थेट राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत १७ कोटी ५९ लाख ८१ हजार रुपये मंजूर करण्यात आला. या निधीतून आता महापालिका चुनालनाला येथे मलशुद्धीकरण केंद्र उभारणार आहे. या मलशुद्धीकरण केंद्रामुळे शहरातील नाल्यांचे पाणी थेट गोदावरीत न जाता ते पाणी शुद्ध  केले जाणार आहे. 

या कामाच्या निविदा मनपाच्या मलनिसारण विभागाने मागवल्या आहेत. २५ सप्टेंबरपर्यंत निविदा भरता येणार असून १० आॅक्टोबर रोजी निविदा संदर्भात पूर्व बैठक होणार आहे तर ही निविदा २२ आॅक्टोबर रोजी उघडल्या जातील, अशीही महापालिकेने स्पष्ट केले आहे. धार्मिकदृष्ट्या महत्व असलेल्या गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम निविदा प्रक्रियेनंतर २४ महिन्यात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. 

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणgodavariगोदावरीpollutionप्रदूषण