शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी चुनाल नाल्यावर होणार मलशुद्धीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:51 IST

पर्यावरण विभागाकडून १७ कोटी ५९ लाखांचा निधी

ठळक मुद्देमहापालिकेचा २० टक्के रक्कमेचा वाटा राहणार आहे.धार्मिकदृष्ट्या महत्व असलेल्या गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न

नांदेड : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत चुनालनाला येथे मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून या कामासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने १७ कोटी ५९ लाख ८१ हजार रुपये मंजूर केले आहेत. यात महापालिकेचा २० टक्के रक्कमेचा वाटा राहणार आहे.

ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाबाबत गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे. महापालिकेने गोदावरी प्रदुषण रोखण्यासाठी १२ वर्षापूर्वी योजना आखली होती. शहरातून वाहणारे १९ नाल्यांचे पाणी थेट गोदावरीत न जाता हे पाणी पाईपलाईनद्वारे देगलूरनाका येथे आणि पुढे बोंढार येथे मलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत नेण्यात आले होते. या योजनेतील अनेक त्रुटीमुळे ही योजना निश्चितच उपयुक्त ठरली नाही. परिणामी आजही गोदावरी नदीचे प्रदुषण कायम होत आहे.  याबाबत अनेक संघटना, राजकीय पक्ष संताप व्यक्त करीत आहेत. 

त्यातच नांदेडचे पालकमंत्री पद राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे आल्यामुळे या गोदावरी प्रदुषणाकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. पालकमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर गोदावरीचे झालेले एकूण प्रदुषण पाहता पर्यावरण विभागाने तत्कालीन महापौर आणि आयुक्तावरही गुन्हे दाखल केले आहेत. पुढे गोदावरी शुद्धीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला. प्रारंभी या आराखड्याला राज्यशासनाकडून मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे तो नव्याने तयार करण्यात आला होता. पालकमंत्री कदम यांनी लक्ष दिल्यानंतर नांदेड महापालिकेला थेट राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत १७ कोटी ५९ लाख ८१ हजार रुपये मंजूर करण्यात आला. या निधीतून आता महापालिका चुनालनाला येथे मलशुद्धीकरण केंद्र उभारणार आहे. या मलशुद्धीकरण केंद्रामुळे शहरातील नाल्यांचे पाणी थेट गोदावरीत न जाता ते पाणी शुद्ध  केले जाणार आहे. 

या कामाच्या निविदा मनपाच्या मलनिसारण विभागाने मागवल्या आहेत. २५ सप्टेंबरपर्यंत निविदा भरता येणार असून १० आॅक्टोबर रोजी निविदा संदर्भात पूर्व बैठक होणार आहे तर ही निविदा २२ आॅक्टोबर रोजी उघडल्या जातील, अशीही महापालिकेने स्पष्ट केले आहे. धार्मिकदृष्ट्या महत्व असलेल्या गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम निविदा प्रक्रियेनंतर २४ महिन्यात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. 

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणgodavariगोदावरीpollutionप्रदूषण