शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विष्णूपुरीसह उर्ध्व पैनगंगा, निम्न मानारमधून सिंचनासाठी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:18 AM

नांदेड - विष्णूपुरी प्रकल्पातील १०० टक्के जलसाठ्यासह अंतेश्वर बंधाऱ्यातील २१ दशलक्ष घनमीटर आणि दिग्रस बंधाऱ्यातून प्राप्त होणाऱ्या २४ दशलक्ष ...

नांदेड - विष्णूपुरी प्रकल्पातील १०० टक्के जलसाठ्यासह अंतेश्वर बंधाऱ्यातील २१ दशलक्ष घनमीटर आणि दिग्रस बंधाऱ्यातून प्राप्त होणाऱ्या २४ दशलक्ष घनमीटर जलसाठ्यातून रब्बी हंगामासाठी तीन पाणी पाळ्या दिल्या जाणार आहेत. त्यातील दोन पाणी पाळ्या पूर्ण झाल्या असून, ७ फेब्रुवारीला तिसरी पाणी पाळी सिंचनासाठी दिली जाणार आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह निम्न मानार प्रकल्पातूनही रब्बीसह उन्हाळी हंगामासाठी पाणी पाळ्या सोडल्या जाणार आहेत. याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पात १०० टक्के (८०.७९ दलघमी) पाणी उपलब्ध आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले असून, त्यातून २१.० दशलक्ष घनमीटर व दिग्रस बंधाऱ्यातून २४.० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. याद्वारे एकूण १२५.९५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. यातून बाष्पीभवन १६.३२ दशलक्ष घनमीटर वजा करता १०९.६३ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एमआयडीसी व ग्रामीण भागासाठी ३८.५५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ७१.०८ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले असून, सुमारे १३ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळ्या दिल्या जाणार आहेत.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातूनही उन्हाळी हंगामात चार पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी दोन पाणी पाळ्या देण्यात आल्या आहेत. आणखी एक पाणी पाळी २७ जानेवारी रोजी दिली जाईल. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात यावर्षी ९६४.१० दशलक्ष घनमीटर (१०० टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे. यातून प्रकल्पातील गाळ व बाष्पीभवन १७६.३२ दशलक्ष घनमीटर वजा जाता ७८७.७८ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ७७.१५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ७१०.६४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले असून, या पाण्यातून ८६ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात ३ पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामात ४ पाणी पाळ्यांचे नियोजन केले आहे. त्यातील २७ नोव्हेंबर २०२० (पूर्ण), ३१ डिसेंबरची पाणी पाळी पूर्ण झाली आहे. २७ जानेवारी २०२१, १ मार्च २०२१, २७ मार्च २०२१, २३ एप्रिल २०२१, १९ मे २०२१ रोजी पाणी सोडले जाईल.

निम्न मानार प्रकल्पात तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच १०० टक्के (१२३.४९ दलघमी) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातून प्रकल्पातील बाष्पीभवन व गाळ २४.८८ दशलक्ष घनमीटर वजा करता ९८.६१ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. नायगाव, कंधार या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी ४.६१ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ९४.०० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले असून, या पाण्यातून सुमारे २३ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तन दिले जाणार आहे. २५ नोव्हेंबर २०२० (पूर्ण), ३० डिसेंबर, २४ जानेवारी रोजी पाणी पाळी देण्यात आली आहे. आता १ मार्च २०२१, १ एप्रिल २०२१, १ मे २०२१ या तारखांमध्ये केवळ आपत्कालीन परिस्थितीतच बदल होऊ शकतो.