शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात; १४ दरवाजे उघडल्याने बंधारा कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 12:20 IST

त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत बंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर (०़५६ टीएमसी) जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला.

ठळक मुद्दे सर्वोच न्यायालयाच्या निकालाप्रमाणे धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले.

धर्माबाद ( नांदेड) : सर्वोच न्यायालयाच्या निकालाप्रमाणे धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले. त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत बंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर (०़५६ टीएमसी) जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हा बंधारा कोरडाठाक झाला.

बाभळी बंधाऱ्याचे लोकार्पण होऊन पाच वर्षे पूर्ण होत आहेत.  १ जुलै रोजी दरवाजे उघडावे व उपलब्ध पाणीसाठा तेलंगणात सोडण्यात यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी दिला. त्याप्रमाणे दरवर्षी ही कार्यवाही होत आहे. रविवारी सकाळी १० वाजता बंधाऱ्याचा पहिला दरवाजा उघडण्यात आला़ त्यानंतर काही वेळातच चौदाही दरवाजे उघडण्यात आले. बंधाऱ्यातील पूर्ण पाणीसाठा तेलंगणात गेला.

यावेळी केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता ई.व्यंकटेश्वरलू, तेलगंणा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता बी.रामाराव, आंध्र प्रदेशचे कार्यकारी अभियंता मोहनराव, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद कहाळेकर, बाभळी बंधारा उपकार्यकारी अभियंता प्रशांत पाटील करखेलीकर, उपअभियंता एस.आर.संतान, शाखा अभियंता एस.बी.पटके, शेलार, देवकांबळे, गंगाधर पाटील बाभळीकर या त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत हे चौदा दरवाजे उघडण्यात आले. यावेळी बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोषणगावकर, सहसचिव जी.पी. मिसाळे, छावाचे मराठवाडा अध्यक्ष सतीश पाटील शिंदे, कुणाल पवारे आदी उपस्थित होते.

काठोकाठ भरलेला बंधारा कोरडाठाक झालाबंधारा पाण्याने काठोकाठ भरला होता. ते जमा झालेले पूर्ण पाणी तेलगंणात गेले. यंदा पाऊस  न झाल्यास बंधारा कोरडाच राहणार आहे़ शासनाने याबाबतीत पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी. तत्पूर्वी उपलब्ध जलसाठ्याचा उपयोग करण्यासाठी बंद पडलेल्या जलसिंचन योजना चालू कराव्यात अथवा नवीन जलसिंचन योजना राबविण्यात यावी़ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बाभळी बंधारा कृती समितीने केली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीTelanganaतेलंगणाNandedनांदेड