शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलातील पाणी हवंय ? चहा, नाश्त्याची आॅर्डर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:24 IST

वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़

ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील मांडवी भागात दोन भांडे पाण्यासाठी रात्रीचा जागर

विश्वास कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमांडवी : वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़नळयोजना नसलेल्या कोठारी, नागापूर, लिंगी, निराळा, भिलगाव, जरूर खेडी या गावांचा पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट बनत आहे़ संभाव्य पाणी बळी टाळण्यासाठी या प्रस्तुत गावांत पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे़ तर राज्यपाल दत्तकगाव जावरला व घाटमाथ्यावरील मोहाडा येथील टँकरचा मंजूर प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे़ सध्या या भागातील परसराम ना़ तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ कडक उन्हाळा दोन महिने बाकी आहे़ ठिकठिकाणचा पाणीप्रश्न तातडीने हाताळला नाही तर पाण्यासाठी मांडवी भागात सर्वत्र हाहाकार उडण्याची शक्यता आहे.अधिक मासात रखरखणारे ऊन अधिकाधिक वाढत आहे़ अशात पळशी, रामजी ना़ तांडा, लिमगुडा, सिंगोडा, रायपूर तांडा, पळशी तांडा, उमरी बा़, सुभाषनगर, गणेशपूर, सिरपूर, मांडवी, कनकी, लक्ष्मीनगर आदी लोकवस्तीच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने भेडसावत आहे़ कर्मचारी वर्गांनी कुटुंब गावाकडे स्थलांतरित केले आहे़कमी पावसाचा फटकायंदा पर्जन्यमान कमी झाल्याने नदी-नाले धो-धो वाहिले नाही़ सिरपूर, मांडवी, दरसांगवी, भिलगाव हे बृहद लघुप्रकल्प काठोकाठ भरले नाहीत़ आजमितीस हे प्रकल्प कोरडे पडल्यात जमा आहे़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर गेली़ ५०० फूट बोअर करूनही पाणी लागत नाही़ गावशिवारात जुन्या काळातील ज्या एक-दोन विहिरी आहेत, तेथेच दिवसरात्र पाण्यासाठी झुंबड हे चित्र पहावयास मिळत आहे़कोरड्या विहिरी खोल करून आडवे बोअर मारले़ त्यातून पाण्याचा निचरा होवून नागरिकांना पाणी मिळू लागले आहे़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा प्रयोग चालू केला - सय्यद, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, किनवटज्या गावात नळयोजना नाही, अशा ठिकाणी सर्वेक्षण करुन पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे- रेणुका जितेंद्र कांबळे, पं़स़ सदस्या़आठवडी बाजारातील सौरऊर्जेवरील नळयोजना पूर्ववत सुरू करण्यासाठी तांत्रिक दुरुस्ती करण्यात येईल -पी़एम़आडे, ग्रामसेवक़घरपोच पाणी ही सवय झालेल्या मंडळीची मात्र चांगलीच कोंडी होत आहे़ २०० रुपये मोजून बैलगाडीद्वारे येणारे पाणी आठवड्यात एकदा मिळत आहे़ या २०० लिटर पाण्यात गुजराण करणे खूप जिकिरीचे बनले आहे़ शेत शिवारातील ६० ते ७० फूट खोल विहिरीत तळाशी असलेल्या पाणी बादली भरून काढताना कसरत करावी लागत आहे़ जुनी-जाणती मंडळी भूतकाळातील पाणी व्यवस्था यावर भाष्य करीत आहेत. नवख्यांची मात्र फटफजिती होत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईhotelहॉटेल