शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

हॉटेलातील पाणी हवंय ? चहा, नाश्त्याची आॅर्डर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:24 IST

वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़

ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील मांडवी भागात दोन भांडे पाण्यासाठी रात्रीचा जागर

विश्वास कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमांडवी : वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़नळयोजना नसलेल्या कोठारी, नागापूर, लिंगी, निराळा, भिलगाव, जरूर खेडी या गावांचा पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट बनत आहे़ संभाव्य पाणी बळी टाळण्यासाठी या प्रस्तुत गावांत पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे़ तर राज्यपाल दत्तकगाव जावरला व घाटमाथ्यावरील मोहाडा येथील टँकरचा मंजूर प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे़ सध्या या भागातील परसराम ना़ तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ कडक उन्हाळा दोन महिने बाकी आहे़ ठिकठिकाणचा पाणीप्रश्न तातडीने हाताळला नाही तर पाण्यासाठी मांडवी भागात सर्वत्र हाहाकार उडण्याची शक्यता आहे.अधिक मासात रखरखणारे ऊन अधिकाधिक वाढत आहे़ अशात पळशी, रामजी ना़ तांडा, लिमगुडा, सिंगोडा, रायपूर तांडा, पळशी तांडा, उमरी बा़, सुभाषनगर, गणेशपूर, सिरपूर, मांडवी, कनकी, लक्ष्मीनगर आदी लोकवस्तीच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने भेडसावत आहे़ कर्मचारी वर्गांनी कुटुंब गावाकडे स्थलांतरित केले आहे़कमी पावसाचा फटकायंदा पर्जन्यमान कमी झाल्याने नदी-नाले धो-धो वाहिले नाही़ सिरपूर, मांडवी, दरसांगवी, भिलगाव हे बृहद लघुप्रकल्प काठोकाठ भरले नाहीत़ आजमितीस हे प्रकल्प कोरडे पडल्यात जमा आहे़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर गेली़ ५०० फूट बोअर करूनही पाणी लागत नाही़ गावशिवारात जुन्या काळातील ज्या एक-दोन विहिरी आहेत, तेथेच दिवसरात्र पाण्यासाठी झुंबड हे चित्र पहावयास मिळत आहे़कोरड्या विहिरी खोल करून आडवे बोअर मारले़ त्यातून पाण्याचा निचरा होवून नागरिकांना पाणी मिळू लागले आहे़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा प्रयोग चालू केला - सय्यद, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, किनवटज्या गावात नळयोजना नाही, अशा ठिकाणी सर्वेक्षण करुन पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे- रेणुका जितेंद्र कांबळे, पं़स़ सदस्या़आठवडी बाजारातील सौरऊर्जेवरील नळयोजना पूर्ववत सुरू करण्यासाठी तांत्रिक दुरुस्ती करण्यात येईल -पी़एम़आडे, ग्रामसेवक़घरपोच पाणी ही सवय झालेल्या मंडळीची मात्र चांगलीच कोंडी होत आहे़ २०० रुपये मोजून बैलगाडीद्वारे येणारे पाणी आठवड्यात एकदा मिळत आहे़ या २०० लिटर पाण्यात गुजराण करणे खूप जिकिरीचे बनले आहे़ शेत शिवारातील ६० ते ७० फूट खोल विहिरीत तळाशी असलेल्या पाणी बादली भरून काढताना कसरत करावी लागत आहे़ जुनी-जाणती मंडळी भूतकाळातील पाणी व्यवस्था यावर भाष्य करीत आहेत. नवख्यांची मात्र फटफजिती होत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईhotelहॉटेल