शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
4
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले सिवानचे जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
5
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
6
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
7
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
8
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
9
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
10
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
11
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
12
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
13
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
14
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
15
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
16
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
17
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
18
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
19
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
20
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...

हॉटेलातील पाणी हवंय ? चहा, नाश्त्याची आॅर्डर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:24 IST

वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़

ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील मांडवी भागात दोन भांडे पाण्यासाठी रात्रीचा जागर

विश्वास कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमांडवी : वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़नळयोजना नसलेल्या कोठारी, नागापूर, लिंगी, निराळा, भिलगाव, जरूर खेडी या गावांचा पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट बनत आहे़ संभाव्य पाणी बळी टाळण्यासाठी या प्रस्तुत गावांत पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे़ तर राज्यपाल दत्तकगाव जावरला व घाटमाथ्यावरील मोहाडा येथील टँकरचा मंजूर प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे़ सध्या या भागातील परसराम ना़ तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ कडक उन्हाळा दोन महिने बाकी आहे़ ठिकठिकाणचा पाणीप्रश्न तातडीने हाताळला नाही तर पाण्यासाठी मांडवी भागात सर्वत्र हाहाकार उडण्याची शक्यता आहे.अधिक मासात रखरखणारे ऊन अधिकाधिक वाढत आहे़ अशात पळशी, रामजी ना़ तांडा, लिमगुडा, सिंगोडा, रायपूर तांडा, पळशी तांडा, उमरी बा़, सुभाषनगर, गणेशपूर, सिरपूर, मांडवी, कनकी, लक्ष्मीनगर आदी लोकवस्तीच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने भेडसावत आहे़ कर्मचारी वर्गांनी कुटुंब गावाकडे स्थलांतरित केले आहे़कमी पावसाचा फटकायंदा पर्जन्यमान कमी झाल्याने नदी-नाले धो-धो वाहिले नाही़ सिरपूर, मांडवी, दरसांगवी, भिलगाव हे बृहद लघुप्रकल्प काठोकाठ भरले नाहीत़ आजमितीस हे प्रकल्प कोरडे पडल्यात जमा आहे़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर गेली़ ५०० फूट बोअर करूनही पाणी लागत नाही़ गावशिवारात जुन्या काळातील ज्या एक-दोन विहिरी आहेत, तेथेच दिवसरात्र पाण्यासाठी झुंबड हे चित्र पहावयास मिळत आहे़कोरड्या विहिरी खोल करून आडवे बोअर मारले़ त्यातून पाण्याचा निचरा होवून नागरिकांना पाणी मिळू लागले आहे़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा प्रयोग चालू केला - सय्यद, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, किनवटज्या गावात नळयोजना नाही, अशा ठिकाणी सर्वेक्षण करुन पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे- रेणुका जितेंद्र कांबळे, पं़स़ सदस्या़आठवडी बाजारातील सौरऊर्जेवरील नळयोजना पूर्ववत सुरू करण्यासाठी तांत्रिक दुरुस्ती करण्यात येईल -पी़एम़आडे, ग्रामसेवक़घरपोच पाणी ही सवय झालेल्या मंडळीची मात्र चांगलीच कोंडी होत आहे़ २०० रुपये मोजून बैलगाडीद्वारे येणारे पाणी आठवड्यात एकदा मिळत आहे़ या २०० लिटर पाण्यात गुजराण करणे खूप जिकिरीचे बनले आहे़ शेत शिवारातील ६० ते ७० फूट खोल विहिरीत तळाशी असलेल्या पाणी बादली भरून काढताना कसरत करावी लागत आहे़ जुनी-जाणती मंडळी भूतकाळातील पाणी व्यवस्था यावर भाष्य करीत आहेत. नवख्यांची मात्र फटफजिती होत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईhotelहॉटेल