शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

विष्णूपुरीत २ दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:52 IST

पावसाचे आगमन लांबल्याने चिंताग्रस्त झालेल्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नांदेडकरांना दिलासा देणारी बाब घडली असून विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यातून १५ जुलैपर्यंत नांदेडकरांची तहान भागणार आहे.

नांदेड : पावसाचे आगमन लांबल्याने चिंताग्रस्त झालेल्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नांदेडकरांना दिलासा देणारी बाब घडली असून विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यातून १५ जुलैपर्यंत नांदेडकरांची तहान भागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून झालेल्या अवैध पाणी उपशामुळे नांदेडकरांना मे महिन्याच्या मध्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाचे कागदावरील नियोजन जूनच्या पहिल्या आठवड्यातच उघडे पडले. जूनच्या पहिल्या आठवड्यात विष्णूपुरी प्रकल्प कोरडाठाक झाला. तेथून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. मुंबईत पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पाण्याचे वास्तव महापालिकेने सांगितले. त्यावेळी सिद्धेश्वर धरणातून पाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणीही झाली. सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरीपर्यंत पाणी आणताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. अखेर ही कसरत यशस्वीच झाली आहे. विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे.आजही विष्णूपुरी प्रकल्प मृत जलसाठ्यातच आहे. प्रकल्पात जिवंत जलसाठा उपलब्ध होण्यासाठी आणखी ०.६६ दलघमी पाणी आवश्यक आहे. सिद्धेश्वर धरणातून आणखी दहा दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. यातून प्रकल्पाचा साठा जिवंत साठ्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले असले तरीही प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसानंतर पाणी उपलब्ध होत आहे. प्रकल्पातच पाणी नाही असे सांगितले जात आहे. त्यातच महावितरणच्या खंडित होणाºया विद्युत पुरवठ्याचाही मोठा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.एकूणच सिद्धेश्वर धरणातील मृत जलसाठ्यातून नांदेडकरांची तहान कशी-बशी भागली आहे. उपलब्ध झालेले पाणी नियोजनपूर्वक पुरवठा करण्याची गरज आहे.पाण्याच्या रक्षणासाठी पथके कार्यरतसिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरी प्रकल्पात १२० कि.मी. अंतर कापून पाणी येत आहे. हे पाणी रस्त्यात उपसले जावू नये यासाठी २१ पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात महापालिका, पाटबंधारे विभाग आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. सिद्धेश्वर धरणापर्यंत ही पथके पाण्यावर गस्त घालत आहेत. पिण्यासाठी येत असलेले पाणी उपसा होऊ नये यावर नियंत्रण ठेवले जात आहे.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका