शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

विष्णूपुरीत २ दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:52 IST

पावसाचे आगमन लांबल्याने चिंताग्रस्त झालेल्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नांदेडकरांना दिलासा देणारी बाब घडली असून विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यातून १५ जुलैपर्यंत नांदेडकरांची तहान भागणार आहे.

नांदेड : पावसाचे आगमन लांबल्याने चिंताग्रस्त झालेल्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नांदेडकरांना दिलासा देणारी बाब घडली असून विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यातून १५ जुलैपर्यंत नांदेडकरांची तहान भागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून झालेल्या अवैध पाणी उपशामुळे नांदेडकरांना मे महिन्याच्या मध्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाचे कागदावरील नियोजन जूनच्या पहिल्या आठवड्यातच उघडे पडले. जूनच्या पहिल्या आठवड्यात विष्णूपुरी प्रकल्प कोरडाठाक झाला. तेथून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. मुंबईत पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पाण्याचे वास्तव महापालिकेने सांगितले. त्यावेळी सिद्धेश्वर धरणातून पाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणीही झाली. सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरीपर्यंत पाणी आणताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. अखेर ही कसरत यशस्वीच झाली आहे. विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे.आजही विष्णूपुरी प्रकल्प मृत जलसाठ्यातच आहे. प्रकल्पात जिवंत जलसाठा उपलब्ध होण्यासाठी आणखी ०.६६ दलघमी पाणी आवश्यक आहे. सिद्धेश्वर धरणातून आणखी दहा दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. यातून प्रकल्पाचा साठा जिवंत साठ्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले असले तरीही प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसानंतर पाणी उपलब्ध होत आहे. प्रकल्पातच पाणी नाही असे सांगितले जात आहे. त्यातच महावितरणच्या खंडित होणाºया विद्युत पुरवठ्याचाही मोठा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.एकूणच सिद्धेश्वर धरणातील मृत जलसाठ्यातून नांदेडकरांची तहान कशी-बशी भागली आहे. उपलब्ध झालेले पाणी नियोजनपूर्वक पुरवठा करण्याची गरज आहे.पाण्याच्या रक्षणासाठी पथके कार्यरतसिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरी प्रकल्पात १२० कि.मी. अंतर कापून पाणी येत आहे. हे पाणी रस्त्यात उपसले जावू नये यासाठी २१ पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात महापालिका, पाटबंधारे विभाग आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. सिद्धेश्वर धरणापर्यंत ही पथके पाण्यावर गस्त घालत आहेत. पिण्यासाठी येत असलेले पाणी उपसा होऊ नये यावर नियंत्रण ठेवले जात आहे.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका