शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

अवकाळी पावसाने लाखोंची हळद भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

नवीन मोंढा परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांच्या माध्यमातून लाखो क्विंटल हळदीची दरवर्षी खरेदी करण्यात येते. बाजार समितीच्या माध्यमातून ...

नवीन मोंढा परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांच्या माध्यमातून लाखो क्विंटल हळदीची दरवर्षी खरेदी करण्यात येते. बाजार समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात; परंतु मागील काही वर्षांपासून बाजार समितींकडून शेतकऱ्यांऐवजी व्यापारी, खरेदीदारांचेच हित जोपासले जात आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील बहुतांश गोडाऊनवर व्यापाऱ्यांचाच ताबा आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल टाकू दिला जात नाही. यासंदर्भात समितीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही गोडाऊन खाली करण्यात आलेले नाहीत. व्यापारी अथवा शेतकरी पंधरा ते तीस दिवसांपर्यंत माल ठेवू शकतात; परंतु मागील अनेक महिन्यांपासून काही प्रस्थापित व्यापाऱ्यांचा गोडाऊनवर ताबा असल्याने हंगामातील माल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना जागाच मिळत नाही. परिणामी, शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी साचून हळद भिजली. शेतकऱ्यांची ही नुकसान भरपाई कोण करून देणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. हळदीबरोबरच काही व्यापाऱ्यांचा चणा, तूरही भिजली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

चौकट

आतापर्यंत दीड लाख कट्टे हळद खरेदी

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख ५४ हजार ७०७ कट्टे हळद खरेदी करण्यात आली आहे. साडेसहा हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. तसेच भुईमूग शेंगा ९ हजार ३८७ पोते, ज्वारी १ हजार ३६ कट्टे, चणा - ११ हजार ९८७, तूर - १ हजार ९२२ कट्टे, सोयाबीन - १२ हजार ९४८ तर गहू ११२२ कट्टे खरेदी करण्यात आले आहेत.

जवळपास चाळीस पोते हळद विक्रीसाठी शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडे विक्रीसाठी आणली होती. माल दुकानासमाेर टाकलेला होता. त्यातील बहुतांश हळद शुक्रवारच्या पाण्याने भिजली. ही नुकसान भरपाई कोण भरून देणार.

- नानाराव कदम, शेतकरी, गणपूर.

बाजार समितीच्या परिसरातील काही व्यापाऱ्यांचा माल अवकाळी पावसामुळे भिजला आहे. ही नैसर्गिक हानी आहे. शेडमध्ये जागा उपलब्ध आहेत; परंतु सदर माल विक्रीसाठी बाहेर ठेवलेला होता आणि त्याचवेळी अचानक पाऊस येऊन शेतमाल भिजला आहे. यासंदर्भाने काही तक्रार आली तर चौकशी करू.

- साहेबराव बाऱ्हाटे, सचिव, कृउबा समिती, नांदेड.