शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

‘मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सरकारचे अन्यायी धोरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:42 IST

लोकसभा निवडणुकीतील प्रचारात नांदेडमध्ये झालेल्या सभेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शासनाच्या अन्यायी धोरणामुळे मराठवाड्याचे वाळवंट होईल, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांच्याशी साधलेला संवाद.

ठळक मुद्देजायकवाडी, पूर्णा, पैनगंगेचे पाणी अडविले

अनुराग पोवळे।मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये झालेल्या सभेत मराठवाड्याचे वाळवंट होईल, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यात कितपत तथ्य आहे?महाराष्टÑ जलसंपत्ती प्राधिकरण कायदा २००५ च्या कलम १२ (ग) अन्वये समन्यायी पाणी वाटपाचे धोरण ठरविण्यात आले आहे. या समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मराठवाड्याला पाणी उपलब्ध झाले नाहीच. त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशाकडेही सरकारने कानाडोळाच केला आहे. परिणामी मराठवाड्याचे आगामी काळात वाळवंट होईल, यात दुमत नाहीच.पाणी विषयावर सरकारचे धोरण उदासीन आहे काय ?मराठवाड्याच्या पाणी वाटपावर सरकारचे धोरण उदासीनच नाही तर अन्यायकारकही आहे. समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीला पाणी उपलब्ध होत नसल्याबाबत आम्ही स्वत: उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या निर्णयात सरकारला न्यायालयाने जायकवाडीचे रेखांकन करुन दोन वर्षांत पाणी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते. सप्टेंबर २०१६ मध्ये न्यायालयाने हे आदेश दिलेले असताना आजपर्यंत रेखांकनाची प्रक्रिया पूर्णच झाली नाही. त्यामुळे सरकारची उदासीनता स्पष्ट होत आहे.या सर्व बाबींचा विष्णूपुरीवर काय परिणाम होईल?विष्णूपुरी प्रकल्प जायकवाडीवर आधारित आहे. जायकवाडीतून झिरपणाऱ्या पाण्यावर विष्णूपुरीत पाणी उपलब्ध होईल, अशी मूळ संकल्पना होती. जायकवाडीत आता पाणी नाही तर विष्णूपुरीत कुठून येणार.मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाबाबत काय करायला हवेसरकारचे गोदावरी खोºयावर नेहमीच दुर्लक्ष झाले आहे.अन्यायकारक भूमिका सरकारने ठेवली आहे. मुळातच कमी पाण्याचा मराठवाडा हा भाग आहे. या भागावर सरकारचे विशेष लक्ष असणे आवश्यक होते ; पण तसे घडले नाही. पाणीप्रश्नावर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका ही उदासीनच आहे. पाण्यावर अभ्यास करणारे अधिकारीही राहिले नाहीत. पाणी प्रश्नावर आता लोकचळवळ उभारली तरच मराठवाड्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सरकारने एकात्मिक जलआराखड्याला मंजुरी दिली आहे. या जल आराखड्यातही मराठवाड्यावर अन्यायच होणार आहे. सरकारची मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावरच अशीच भूमिका राहिली तर आगामी काळात मराठवाड्याचे वाळवंट होईल.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाई