शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सरकारचे अन्यायी धोरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:42 IST

लोकसभा निवडणुकीतील प्रचारात नांदेडमध्ये झालेल्या सभेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शासनाच्या अन्यायी धोरणामुळे मराठवाड्याचे वाळवंट होईल, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांच्याशी साधलेला संवाद.

ठळक मुद्देजायकवाडी, पूर्णा, पैनगंगेचे पाणी अडविले

अनुराग पोवळे।मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये झालेल्या सभेत मराठवाड्याचे वाळवंट होईल, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यात कितपत तथ्य आहे?महाराष्टÑ जलसंपत्ती प्राधिकरण कायदा २००५ च्या कलम १२ (ग) अन्वये समन्यायी पाणी वाटपाचे धोरण ठरविण्यात आले आहे. या समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मराठवाड्याला पाणी उपलब्ध झाले नाहीच. त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशाकडेही सरकारने कानाडोळाच केला आहे. परिणामी मराठवाड्याचे आगामी काळात वाळवंट होईल, यात दुमत नाहीच.पाणी विषयावर सरकारचे धोरण उदासीन आहे काय ?मराठवाड्याच्या पाणी वाटपावर सरकारचे धोरण उदासीनच नाही तर अन्यायकारकही आहे. समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीला पाणी उपलब्ध होत नसल्याबाबत आम्ही स्वत: उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या निर्णयात सरकारला न्यायालयाने जायकवाडीचे रेखांकन करुन दोन वर्षांत पाणी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते. सप्टेंबर २०१६ मध्ये न्यायालयाने हे आदेश दिलेले असताना आजपर्यंत रेखांकनाची प्रक्रिया पूर्णच झाली नाही. त्यामुळे सरकारची उदासीनता स्पष्ट होत आहे.या सर्व बाबींचा विष्णूपुरीवर काय परिणाम होईल?विष्णूपुरी प्रकल्प जायकवाडीवर आधारित आहे. जायकवाडीतून झिरपणाऱ्या पाण्यावर विष्णूपुरीत पाणी उपलब्ध होईल, अशी मूळ संकल्पना होती. जायकवाडीत आता पाणी नाही तर विष्णूपुरीत कुठून येणार.मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाबाबत काय करायला हवेसरकारचे गोदावरी खोºयावर नेहमीच दुर्लक्ष झाले आहे.अन्यायकारक भूमिका सरकारने ठेवली आहे. मुळातच कमी पाण्याचा मराठवाडा हा भाग आहे. या भागावर सरकारचे विशेष लक्ष असणे आवश्यक होते ; पण तसे घडले नाही. पाणीप्रश्नावर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका ही उदासीनच आहे. पाण्यावर अभ्यास करणारे अधिकारीही राहिले नाहीत. पाणी प्रश्नावर आता लोकचळवळ उभारली तरच मराठवाड्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सरकारने एकात्मिक जलआराखड्याला मंजुरी दिली आहे. या जल आराखड्यातही मराठवाड्यावर अन्यायच होणार आहे. सरकारची मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावरच अशीच भूमिका राहिली तर आगामी काळात मराठवाड्याचे वाळवंट होईल.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाई