शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सरकारचे अन्यायी धोरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:42 IST

लोकसभा निवडणुकीतील प्रचारात नांदेडमध्ये झालेल्या सभेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शासनाच्या अन्यायी धोरणामुळे मराठवाड्याचे वाळवंट होईल, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांच्याशी साधलेला संवाद.

ठळक मुद्देजायकवाडी, पूर्णा, पैनगंगेचे पाणी अडविले

अनुराग पोवळे।मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये झालेल्या सभेत मराठवाड्याचे वाळवंट होईल, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यात कितपत तथ्य आहे?महाराष्टÑ जलसंपत्ती प्राधिकरण कायदा २००५ च्या कलम १२ (ग) अन्वये समन्यायी पाणी वाटपाचे धोरण ठरविण्यात आले आहे. या समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मराठवाड्याला पाणी उपलब्ध झाले नाहीच. त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशाकडेही सरकारने कानाडोळाच केला आहे. परिणामी मराठवाड्याचे आगामी काळात वाळवंट होईल, यात दुमत नाहीच.पाणी विषयावर सरकारचे धोरण उदासीन आहे काय ?मराठवाड्याच्या पाणी वाटपावर सरकारचे धोरण उदासीनच नाही तर अन्यायकारकही आहे. समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीला पाणी उपलब्ध होत नसल्याबाबत आम्ही स्वत: उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या निर्णयात सरकारला न्यायालयाने जायकवाडीचे रेखांकन करुन दोन वर्षांत पाणी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते. सप्टेंबर २०१६ मध्ये न्यायालयाने हे आदेश दिलेले असताना आजपर्यंत रेखांकनाची प्रक्रिया पूर्णच झाली नाही. त्यामुळे सरकारची उदासीनता स्पष्ट होत आहे.या सर्व बाबींचा विष्णूपुरीवर काय परिणाम होईल?विष्णूपुरी प्रकल्प जायकवाडीवर आधारित आहे. जायकवाडीतून झिरपणाऱ्या पाण्यावर विष्णूपुरीत पाणी उपलब्ध होईल, अशी मूळ संकल्पना होती. जायकवाडीत आता पाणी नाही तर विष्णूपुरीत कुठून येणार.मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाबाबत काय करायला हवेसरकारचे गोदावरी खोºयावर नेहमीच दुर्लक्ष झाले आहे.अन्यायकारक भूमिका सरकारने ठेवली आहे. मुळातच कमी पाण्याचा मराठवाडा हा भाग आहे. या भागावर सरकारचे विशेष लक्ष असणे आवश्यक होते ; पण तसे घडले नाही. पाणीप्रश्नावर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका ही उदासीनच आहे. पाण्यावर अभ्यास करणारे अधिकारीही राहिले नाहीत. पाणी प्रश्नावर आता लोकचळवळ उभारली तरच मराठवाड्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सरकारने एकात्मिक जलआराखड्याला मंजुरी दिली आहे. या जल आराखड्यातही मराठवाड्यावर अन्यायच होणार आहे. सरकारची मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावरच अशीच भूमिका राहिली तर आगामी काळात मराठवाड्याचे वाळवंट होईल.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाई