शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावे : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 13:26 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना डी. लिट प्रदान

नांदेड : देशात रस्ते, महामार्गाचे जाळे निर्माण होत आहे. त्यांचा उपयोग करून शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी काही मूलभूत कामे तसेच संशोधन करून मार्ग काढावा. कारण शेतकरी, विद्यार्थी आणि महिला या तीन घटकांच्या उत्थानावरच समाजाचे कल्याण अवलंबून असते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५वा दीक्षांत समारंभ दि. २४ फेब्रुवारीला विद्यापीठात थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती, राज्यपाल रमेश बैस, तर प्रमुख पाहुणे म्हणून होमी भाभा राष्ट्रीय संस्था अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांची आभासी उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना डी.लिट प्रदान करण्यात आली.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना गडकरी यांनी, देशाचे भविष्य हे युवकांच्या हाती असून, त्यांनी चांगले गुण मिळविण्यासोबतच चांगले नागरिक होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरी मिळविण्यापेक्षा नोकरी देणारे झाले पाहिजे. या देशातील आजही अनेक नागरिकांना घर नाही, अन्न नाही. अशा लोकांच्या जीवनात तुम्ही प्रकाश बनून आले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदल कसा होइल, हा विचार केला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, यासाठी संशोधन केले पाहिजे. तुमचे ज्ञान हे समाजासाठी उपयोगी आले पाहिजे.

माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम म्हणाले, शिक्षणाने बौद्धिक स्वावलंबन व आर्थिक स्वावलंबन निर्माण झाले पाहिजे. शिक्षण म्हणजे केवळ पदवीचा कागद नाही. शिक्षण म्हणजे संस्कार. तुमचा आचार, विचार व समाजातील व्यवहार हा संस्कारातून प्रकट होतो. तुमचे शिक्षण तुमच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकट होते. जागतिकीकरणाच्या लाटेत कौशल्ये तरुणांना आत्मसात करता यावीत, यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करणे मोठे आव्हान आहे. विद्यापीठाचा उद्देश ज्ञानाची निर्मिती आणि संवर्धन करून त्याचा उपयोग मानवी समाजाच्या विकासासाठी करणे हा आहे.

डॉ. अनिल काकोडकर हे आभासी भाषणात म्हणाले, विद्यापीठात समाजाचे प्रतिबिंब व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनाची सोय निर्माण झाली पाहिजे. अशाप्रकारे ज्ञानाधिष्ठित शाश्वत मानव विकास व पर्यावरण संवर्धन साधताना त्यातून कोणत्याही प्रकारचे शोषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. जागतिक स्पर्धेत पुढे येत असताना देशातील विषमता नष्ट करणे हीसुद्धा आपली प्राथमिकता असावी. करिअरच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी उच्चशिक्षणाचा उपयोग राष्ट्रविकासासाठी करावा, असे आवाहन केले.

स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रास्ताविक व विद्यापीठ अहवाल सादर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी तर माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी केले. या सोहळ्यास प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा मूल्यमापन व नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. योगिनी सातारकर, डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडNitin Gadkariनितीन गडकरी