शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावे : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 13:26 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना डी. लिट प्रदान

नांदेड : देशात रस्ते, महामार्गाचे जाळे निर्माण होत आहे. त्यांचा उपयोग करून शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी काही मूलभूत कामे तसेच संशोधन करून मार्ग काढावा. कारण शेतकरी, विद्यार्थी आणि महिला या तीन घटकांच्या उत्थानावरच समाजाचे कल्याण अवलंबून असते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५वा दीक्षांत समारंभ दि. २४ फेब्रुवारीला विद्यापीठात थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती, राज्यपाल रमेश बैस, तर प्रमुख पाहुणे म्हणून होमी भाभा राष्ट्रीय संस्था अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांची आभासी उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना डी.लिट प्रदान करण्यात आली.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना गडकरी यांनी, देशाचे भविष्य हे युवकांच्या हाती असून, त्यांनी चांगले गुण मिळविण्यासोबतच चांगले नागरिक होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरी मिळविण्यापेक्षा नोकरी देणारे झाले पाहिजे. या देशातील आजही अनेक नागरिकांना घर नाही, अन्न नाही. अशा लोकांच्या जीवनात तुम्ही प्रकाश बनून आले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदल कसा होइल, हा विचार केला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, यासाठी संशोधन केले पाहिजे. तुमचे ज्ञान हे समाजासाठी उपयोगी आले पाहिजे.

माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम म्हणाले, शिक्षणाने बौद्धिक स्वावलंबन व आर्थिक स्वावलंबन निर्माण झाले पाहिजे. शिक्षण म्हणजे केवळ पदवीचा कागद नाही. शिक्षण म्हणजे संस्कार. तुमचा आचार, विचार व समाजातील व्यवहार हा संस्कारातून प्रकट होतो. तुमचे शिक्षण तुमच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकट होते. जागतिकीकरणाच्या लाटेत कौशल्ये तरुणांना आत्मसात करता यावीत, यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करणे मोठे आव्हान आहे. विद्यापीठाचा उद्देश ज्ञानाची निर्मिती आणि संवर्धन करून त्याचा उपयोग मानवी समाजाच्या विकासासाठी करणे हा आहे.

डॉ. अनिल काकोडकर हे आभासी भाषणात म्हणाले, विद्यापीठात समाजाचे प्रतिबिंब व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनाची सोय निर्माण झाली पाहिजे. अशाप्रकारे ज्ञानाधिष्ठित शाश्वत मानव विकास व पर्यावरण संवर्धन साधताना त्यातून कोणत्याही प्रकारचे शोषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. जागतिक स्पर्धेत पुढे येत असताना देशातील विषमता नष्ट करणे हीसुद्धा आपली प्राथमिकता असावी. करिअरच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी उच्चशिक्षणाचा उपयोग राष्ट्रविकासासाठी करावा, असे आवाहन केले.

स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रास्ताविक व विद्यापीठ अहवाल सादर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी तर माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी केले. या सोहळ्यास प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा मूल्यमापन व नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. योगिनी सातारकर, डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडNitin Gadkariनितीन गडकरी