शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

नांदेड परिमंडळात ‘सौभाग्य’ योजनेतंर्गत १० हजार घरे प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 7:39 PM

‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळात ज्या घरांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा १० हजार ६०४ कुटुंबांना वीजजोडणी देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे.

नांदेड : ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळात ज्या घरांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा १० हजार ६०४ कुटुंबांना वीजजोडणी देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे.

देशातील नागरिकांना २४ तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने २५ सप्टेंबरला २०१७ रोजी  ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजना सुरू केली. योजनेतंर्गत केवळ शहरच नव्हे, तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाºया शेवटच्या घटकांनाही वीजजोडणी द्यावयाची आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी 'सौभाग्य' योजनेच्या माध्यमातून वीज न पोहोचलेल्या कुटुंबांना त्यांचे विजेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व वीजजोडण्या जुलैअखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने कामे गतीने केली जात आहेत. दरम्यान, ७ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नांदेड परिमंडळात वीजजोडणीपासून वंचित असलेल्या ८५ हजार ७७७ कुटुंबांपैकी १० हजार ६०४ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. 

यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील  ५१ हजार २० कुटुंबियांना सदर योजनेअंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार ओह. आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील २५ हजार ४३२ कुटुंबियांपैकी  २ हजार ३५३ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली. तर परभणी जिल्ह्यातील ९ हजार ३२५ कुटुंबांपैकी ३ हजार ६८९ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. सदर योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत वीजजोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिनपॉईंट फिटिंग विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना अवघ्या पाचशे रूपयांमध्ये वीजजोडणी मिळणार असून हे शुल्कही नियमित वीजबिलासोबत दहा समान हप्त्यांत भरावयाचे आहे.

रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार सौभाग्य योजनेअंतर्गत परिमंडळातील प्रत्येक गरिबाच्या घरात वीजजोडणी दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ होणार आहे. गोरगरिबांच्या चेहºयांवर हास्य फुलवू शकणारी ही योजना यशस्वी व्हावी, यासाठी  गरजूंनी आपल्या नजीकच्या महावितरण कार्यालयात जावून संपर्क करावा, असे आवाहन महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता संतोष वहाणे यांनी केले आहे.विशेष मोहिमेंतर्गत नांदेड परिमंडळात आतापर्यंत वीज जोडणीपासून वंचित असलेल्या ८५ हजार ७७७ कुटुंबांपैकी  १० हजार ६०४ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.

टॅग्स :Nandedनांदेडmahavitaranमहावितरणelectricityवीजgovernment schemeसरकारी योजना