शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दोन दिग्गजांनी बनविला ‘भारत जोडो’चा रोड मॅप! १२ राज्ये अन् दाेन केंद्रशासित प्रदेशांचा असा केला गेला अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 06:40 IST

देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी ते उत्तर टोकाच्या श्रीनगर-काश्मीरपर्यंत तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरच्या या यात्रेचे नियोजन

नांदेड :

तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरचा पायी प्रवास... १५० दिवसांचा मुक्काम. राज्यपरत्वे बदलणारे हवामान, जंगल, डोंगरदऱ्या आदींचा अभ्यास करून ‘भारत जोडो’ यात्रेचा रोड मॅप बनविला आहे, तो काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी. त्यामुळेच त्यांना खासदार राहुल गांधीची टीम ‘भारत जोडो’चे आर्किटेक्ट म्हणून संबोधतात.  

देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी ते उत्तर टोकाच्या श्रीनगर-काश्मीरपर्यंत तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरच्या या यात्रेचे नियोजन करताना दररोजचे पायी चालत जाणारे अंतर, होणारे मुक्काम आदी बाबींचा विचार करून रोड मॅप बनविण्यात आला आहे. खासदार राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह यांनी या यात्रेचे नियोजन केले आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करत ही यात्रा देशाच्या वरच्या टोकाला असलेल्या श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकावूनच थांबेल, असा विश्वास काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. कोणतीच शक्ती- आंधी या यात्रेला रोखू शकत नाही, असे ते सांगतात. 

१५० दिवसांची पदयात्राखासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल झाली असून, आजपर्यंत ६३ मुक्काम झाले आहेत. १५० दिवसांच्या पदयात्रेत देशभरातील १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल.

मराठवाडा- विदर्भाला दिले प्राधान्य भारत जोडो यात्रेचा मॅप तयार करताना महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते. मराठवाड्यातील दोन जिल्हे आणि विदर्भातील वाशीम, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांतून ही यात्रा जात आहे. राज्यात काँग्रेसची पीछेहाट होत असताना नांदेड जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसची साथ दिली आहे. राज्यातील एकूण २८८ पैकी ४४ जागी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यात तब्बल २३ आमदार हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. त्याच मार्गाने अथवा विधानसभा मतदारसंघातून भारत जोडो यात्रा जात असल्याने निश्चितच विद्यमान आमदारांना फायदा होईल, असे मानले जात आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी