शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोराडीतील दोन वीजनिर्मिती संच बंद; विदर्भ-मराठवाड्यात इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू 

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: September 2, 2023 13:30 IST

तब्बल १३०० मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाल्याने लोडशेडिंग वाढविण्यात आले आहे

नांदेड : सध्या महाराष्ट्रातील विविध औष्णिक केंद्रांवरील वीजनिर्मिती कमी झाल्याने आळीपाळीने महाराष्ट्रातील विविध भागांतून वीजभार कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या नांदेड विभागातून ५० मेगावॅट विजेचा लोड कमी करण्यासाठी इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू केले आहे. कोराडीतील दोन संच बंद असल्यामुळे जवळपास १,३०० मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. यापूर्वी विदर्भातील ५०० मेगावॅट विजेचा लोड पुसद, जयसिंगपूर, छत्रपती संभाजीनगर, साकोली, श्रीरामपूर यासह १३ उपकेंद्रांवरून कमी करण्यात आला होता. आता नांदेड, परभणी, हिंगोलीसह मराठवाड्यातील अनेक भागांतून ३५ ते ५० मेगावॅट विजेची बचत करणे सुरू आहे.

जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतातील कृषिपंप तसेच घरगुती उपकरणे कूलर, फॅन, एसी पुन्हा सुरू झाल्याने त्याचा परिणाम महावितरणच्या वीज वितरण प्रणालीवर जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात दिवस व रात्रीच्या वेळेला इमर्जन्सी लोडशेडिंग वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्र भारनियमनमुक्त असला तरी ग्रामीण भागातील लोडशेडिंग मात्र सुरू आहे. पावसाळा सुरू असूनही विजेचा वापर वाढल्याने सर्वच ठिकाणी फिडरवर भार येत आहे. ग्रामीण भागात दिवसातून चार ते पाच वेळा वीज खंडित केली जाते.

नांदेड ग्रामीणमध्ये येत असलेल्या लोहा, कंधार, नांदेड ग्रामीण, मुदखेड व अर्धापूर या भागात इमर्जन्सी लोडशेडिंग वाढली आहे. एखाद्या फिडरवर लोड वाढला की, लोड देण्यास सांगितले जाते. सध्या ज्या ठिकाणी वीजनिर्मिती होते, तेथे वीजनिर्मिती कमी आणि मागणी जास्त, पुरवठा तेवढाच यामुळे राज्यातील सर्व भागात आळीपाळीने इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू करण्यात आलेले आहे. महावितरणने इमर्जन्सी लोडशेडिंग करताना कुठलेही वेळापत्रक केले नसल्याने अनेकजण याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शेतकरी व व्यावसायिक आपला रोष महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर काढत आहेत. संवेदनशील उपकेंद्रांमध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त करावे, प्रादेशिक कार्यालयाने सूचित केल्यानंतरही सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली नसल्यामुळे दिवस-रात्र पाळीवरील यंत्रचालकांना अनेकांचा रोष पत्करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे बाहेरील वीज खरेदी बंद असल्याने त्याचा परिणाम लोड वाढून लोडशेडिंगवर होत आहे. निर्मिती कमी आणि मागणी जास्त यामुळे वीज बचतीसाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत.

कोराडी येथील दोन संचाची देखभाल, दुरुस्तीसंचाची देखभाल करण्यासाठी कोराडी येथील वीजनिर्मितीचे दोन संच बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दोन विद्युत संच बंद असल्यामुळे प्रत्येकी ६६० मेगावॅट म्हणजे १,३२० मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. सदर संच सुरू होण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

३ फेज ऐवजी सिंगल फेजज्या भागात ३ फेज विजेचा पुरवठा होत होता, त्या ठिकाणी आता सिंगल फेज विजेचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. नांदेड परिमंडळातून दररोज ५० मेगावॅट विजेचा लोड कमी करून देण्यात येत आहे. त्यामुळे दिवसातून एक ते दोन तास इमर्जन्सी लोडिंग करण्यात येत आहे. नांदेड विभागात एक ते दोन तास इमर्जन्सी लोडशेडिंग करून ३५ ते ५० मेगावॅट विजेचा भार कमी केला जात आहे.- सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता महावितरण नांदेड

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज