शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नांदेड शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:49 IST

परिस्थिती बिकट झाल्यामुळे महापालिकेने रविवारी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़

ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णय १८ नोव्हेंबरपासून होणार अंमलबजावणी पाणीटंचाईची समस्या भीषण

नांदेड : शहराची भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यात गुरुवारी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी पाळीही सोडण्यात आली आहे़ त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी घट झाली आहे़ परिस्थिती बिकट झाल्यामुळे महापालिकेने रविवारी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़यंदा नांदेड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प भरला होता़ प्रकल्पाचे दरवाजे उघडून अनेकवेळा पाणी गोदावरीत सोडण्यात आले होते़ परतीच्या पावसात दरवर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्या जाते़ परंतु यंदा परतीच्या पावसाने दगा दिला़त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाच नाही़ त्यात गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यावरुन शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात येत आहे़ गेल्या महिनाभरात विष्णूपुरी प्रकल्पातून तब्बल २३ दलघमी पाण्याचा उपसा करण्यात आला आहे़ गोदावरी नदीवर आजघडीला प्रशासकीय आकडेवारीनुसार अडीच हजार वीजपंपाद्वारे पाणी उपसा करण्यात येत आहे़त्यातील १ हजारावर विद्युत पंप हे अनधिकृत आहेत़ प्रकल्पातून प्रतिदिन ०़७५ दलघमी पाणीसाठा कमी होत आहे़याच वेगाने उपसा सुरु राहिल्यास फेब्रुवारीपर्यंतच विष्णूपुरी कोरडाठाक पडण्याची भिती आहे़ प्रकल्पातून होणारा हा पाणीउपसा रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली होती़ त्यात गुुरुवारी विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी पाळी सोडण्यात आली़३० नोव्हेंबरपर्र्यंंत हे पाणी सोडण्यात येणार आहे़ प्रकल्पातून सिंचनासाठी पहिली पाळी सोडण्यात आली असली तरी, दुसरी पाळी मात्र अनिश्चित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठा संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे महापालिकेसह जिल्हा प्रशासनही चिंतीत झाले आहे़ त्यामुळे सद्यस्थितीला असलेले पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही़ या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त लहूराज माळी यांनी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ यापूर्वी शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ येत्या काही दिवसात नांदेडकरांवर जलसंकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत़पर्यायी पाणीपुरवठ्यावर भिस्त

  • शहरासाठी इसापूर प्रकल्पातील आधारीत सांगवी येथील बंधाºयावर पर्यायी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे़ सांगवी बंधा-याची क्षमता तसेच पंपगृहाची क्षमता घेता उत्तर नांदेड भागातील जवळपास दोन लाख लोकांनाच या योजनेद्वारे पाणी मिळू शकते़ आता विष्णूपुरीतील पाण्याचा वेगाने उपसा होत असल्यामुळे पर्यायी पाणीपुरवठ्यावर भिस्त राहणार आहे़ परंतु पर्यायी पाणीपुरवठा योजनेलाही मर्यादा आहेत़ त्यामुळे नांदेडकरांची मोठी पंचाईत होणार असल्याचे दिसत आहे़
  • विष्णूपुरी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यात नांदेडला इतर ठिकाणाहून पाणी मिळण्याची शक्यताही धूसर आहे़ त्यामुळे नागरीकांनी उपलब्ध असलेले पाणी जपून वापरण्याची गरज आहे़ पाण्याचा दुरुपयोग टाळून नळाला तोट्या बसवाव्यात असे आवाहन महापालिकेने केले आहे़
टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरण