शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षांनंतर बाळ झालं अन् डोळ्यादेखत गेलं... नांदेडमधील मृत्यू तांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 05:40 IST

त्याचा जीव घेतला म्हणत बाळाच्या आईने हंबरडा फोडल्याने काळीज चर्रर्र झाले

श्रीनिवास भोसले

नांदेड : हातपाय वाकडे झाले... बाळाला झटके येत होते. बघा बघा म्हणून विनवण्या केल्या... तरी बघत नव्हते... या डॉक्टरांनी माझ्या बाळाचा जीव घेतला, म्हणत पैठणच्या एका मातेने हंबरडा फोडला. आक्रोश करणाऱ्या मातेला शांत व्हा, म्हणून धीर देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना, ‘मी कसं शांत राहू... मला १२ वर्षांनंतर बाळ झालं हाेतं. त्याचाही जीव घेतला हो...’, असे म्हणत या मातेने टाहो फोडला. या महिलेच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावले. 

 पैठण येथील एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिच्या बाळाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. परंतु, गुरुवारी त्याचा झटके येऊन मृत्यू झाला. तब्बल बारा वर्षांनंतर जी स्त्री आई झाली, तिचे मातृत्व अवघ्या काही क्षणात हिरावल्याने होणाऱ्या वेदना तिलाच माहीत. मृत्यू सत्र कधी थांबणार, असा संतप्त सवाल  केला जात आहे.

दिल्ली वाऱ्या झाल्या असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नांदेडात येऊन मयत बालकांच्या आईचे दु:ख जाणून घ्यावे. एकप्रकारे सरकारने ही सर्वसामान्य मायबाप जनतेची केलेली हत्याच असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत. या घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

- सुुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘मंत्री साहेब, कुठंय औषधी...?’ 

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट दिल्यानंतर मुबलक औषधसाठा असल्याचा दावा केला होता. परंतु, आजही खासगीतून गोळ्या-औषधे आणायला लावली जात आहेत.

प्रशासन आणि शासनाच्या खोट्या आश्वासनांमध्ये रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये वैर निर्माण होत आहे. एकीकडे प्रशासन आणि शासन औषधसाठा असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात औषधे नसल्याने डॉक्टर, नर्स ती चिठ्ठीवर लिहून देत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन नातेवाइक डॉक्टर, नर्सच्या अंगावर धाऊन येत आहेत.

‘आम्ही टीव्हीत पाहिलं... औषधे आहेत... तुम्ही का देत नाही...’ असे म्हणत रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर आणि नर्स यांच्यासोबत वाद घालत आहेत.

न्यायालयीन चौकशी करा, दहा लाख द्या

मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही.

नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना सरकारने तातडीने १० लाख रुपयांची मदत द्यावी, तसेच राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणाची माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना केली आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे, संजय लाखे पाटील यांचा समावेश होता.

टॅग्स :NandedनांदेडSupriya Suleसुप्रिया सुळे