शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

बारा वर्षांनंतर बाळ झालं अन् डोळ्यादेखत गेलं... नांदेडमधील मृत्यू तांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 05:40 IST

त्याचा जीव घेतला म्हणत बाळाच्या आईने हंबरडा फोडल्याने काळीज चर्रर्र झाले

श्रीनिवास भोसले

नांदेड : हातपाय वाकडे झाले... बाळाला झटके येत होते. बघा बघा म्हणून विनवण्या केल्या... तरी बघत नव्हते... या डॉक्टरांनी माझ्या बाळाचा जीव घेतला, म्हणत पैठणच्या एका मातेने हंबरडा फोडला. आक्रोश करणाऱ्या मातेला शांत व्हा, म्हणून धीर देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना, ‘मी कसं शांत राहू... मला १२ वर्षांनंतर बाळ झालं हाेतं. त्याचाही जीव घेतला हो...’, असे म्हणत या मातेने टाहो फोडला. या महिलेच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावले. 

 पैठण येथील एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिच्या बाळाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. परंतु, गुरुवारी त्याचा झटके येऊन मृत्यू झाला. तब्बल बारा वर्षांनंतर जी स्त्री आई झाली, तिचे मातृत्व अवघ्या काही क्षणात हिरावल्याने होणाऱ्या वेदना तिलाच माहीत. मृत्यू सत्र कधी थांबणार, असा संतप्त सवाल  केला जात आहे.

दिल्ली वाऱ्या झाल्या असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नांदेडात येऊन मयत बालकांच्या आईचे दु:ख जाणून घ्यावे. एकप्रकारे सरकारने ही सर्वसामान्य मायबाप जनतेची केलेली हत्याच असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत. या घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

- सुुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘मंत्री साहेब, कुठंय औषधी...?’ 

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट दिल्यानंतर मुबलक औषधसाठा असल्याचा दावा केला होता. परंतु, आजही खासगीतून गोळ्या-औषधे आणायला लावली जात आहेत.

प्रशासन आणि शासनाच्या खोट्या आश्वासनांमध्ये रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये वैर निर्माण होत आहे. एकीकडे प्रशासन आणि शासन औषधसाठा असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात औषधे नसल्याने डॉक्टर, नर्स ती चिठ्ठीवर लिहून देत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन नातेवाइक डॉक्टर, नर्सच्या अंगावर धाऊन येत आहेत.

‘आम्ही टीव्हीत पाहिलं... औषधे आहेत... तुम्ही का देत नाही...’ असे म्हणत रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर आणि नर्स यांच्यासोबत वाद घालत आहेत.

न्यायालयीन चौकशी करा, दहा लाख द्या

मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही.

नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना सरकारने तातडीने १० लाख रुपयांची मदत द्यावी, तसेच राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणाची माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना केली आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे, संजय लाखे पाटील यांचा समावेश होता.

टॅग्स :NandedनांदेडSupriya Suleसुप्रिया सुळे