शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीचे बारा दरवाजे बदलण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 19:42 IST

सिद्धेश्वर धरणातील पाण्याचा येवा सुरूच

ठळक मुद्देयुद्धपातळीवर काम करून एका दरवाज्याची गळती थांबविली 

नांदेड : नांदेड शहरासह अठरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या आणि सिंचनाची व्यवस्था असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पाचे बारा दरवाजे बदलण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात हे काम सुरू होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली. बुधवारी प्रकल्पाच्या ११ क्रमांकाच्या दरवाजातून गळती सुरू झाली होती. ही गळती रात्री ११ वाजता थांबवण्यात आली. 

विष्णूपुरी प्रकल्पाच्या १८ पैकी क्रमांक ११ च्या दरवाज्यातून  बुधवारी रात्री गळती सुरू झाली होती. ही बाब समजताच पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामध्ये विष्णूपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांच्यासह यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता एम.डी. सूर्यवंशी, उपअभियंता शिवणगावक तसेच इतर कनिष्ठ अभियंते प्रकल्पस्थळी पोहचले तर पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार हे औरंगाबादला होते. या बाबीची माहिती समजताच ते तातडीने बुधवारी रात्रीच प्रकल्पस्थळी पोहचले. पहाटे ३ वाजेपर्यंत हे सर्व अधिकारी प्रकल्पस्थळी होते. गळतीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे तसेच दरवाजा निखळल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार उद्भवणार याची खबरदारी घेण्यात आली. 

बुधवारी गळती सुरू झाल्यानंतर तातडीने प्रकल्पाचे स्टॉप लॉक गेट टाकण्याचे काम सुरु करण्यात आले  रात्री ११ वाजता हे काम पूर्ण झाले आणि गळती पूर्णत: थांबविण्यात आली. या सर्व दरवाज्यांची मुदत संपली आहे. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून दरवाजे बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. सहा दरवाजे बदलण्यात आले आहेत. उर्वरीत दरवाजे लांबलेल्या पावसामुळे बदलता आले नाही. त्यामुळे प्रकल्पाचे उर्वरीत १२ दरवाजे बदलण्याचे काम येत्या १५ दिवसात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  त्यातील सहा दरवाज्यांचे साहित्य प्रकल्पस्थळी उपलब्ध झाले आहे. इतर दरवाज्यांचे साहित्यही लवकरच मागवण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.

गोदावरी नदीवर १९८९ मध्ये विष्णूपुरी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पावर नांदेड शहराची तहान भागतेच. त्याचवेळी इतर १८ गावांचा पाणीपुरवठा योजनाही या प्रकल्पावर आधारीत आहेत. विष्णूपुरी प्रकल्पाची एकूण पाणी क्षमता ८३.५५ दलघमी इतकी आहे तर जलाशयाची पूर्णसंचय पातळी ३५५ मीटर इतकी आहे. या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ५१ हजार ३९० चौरस किलोमीटर इतके आहे. सदर प्रकल्पासाठी १६९ कोटी ११ लाख रुपये सन १९८९-९० च्या दरसुचीनुसार खर्च करण्यात आले होते.

या प्रकल्पांतर्गत ३७ हजार ७८५ हेक्टर क्षेत्र वहिती लायक आहे तर सिंचनाखाली २८ हजार ३४० हेक्टर क्षेत्र येते. दरम्यान, या प्रकल्पातील गाळ उपसा करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती. पाऊस लांबल्याने जिल्हा प्रशासनाने गाळ काढण्यास प्रारंभ केला. मात्र किती गाळ काढला हे मात्र पुढे आले नाही. त्याचवेळी दरवाजा बदलण्याचा विषयही अनेकदा चर्चेला आला होता.

विष्णूपुरीचा दरवाजा उघडलासिद्धेश्वर धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पूर्णा नदीचे पाणी विष्णूपुरीत दाखल होत असून प्रकल्प शंभरटक्के भरलेला आहे. त्यामुळे पाण्याची आवक पाहता प्रकल्पाचा एक दरवाजा गुरुवारी सायंकाळी सहा वाजता उघडण्यात आला होता. यातून अतिरिक्त पाणी गोदापात्रात सोडण्यात आले. विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरलेला असून पाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वेळीच प्रकल्पातून होणारी गळती थांबविण्यात आली असून इतर दरवाजेही बदलण्यात येणार आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणी