शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

सुशिक्षित बेकार युवकाने माळरानावर पिकविली हळद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:31 IST

यशकथा : गोविंदराव गायकवाड यांनी माळरान, उंच ठिकाणी असलेल्या शेतीला वहितीखाली आणण्याचा निर्धार केला.

- डॉ. गंगाधर तोगरे, (कंधार, जि. नांदेड)

कळका, ता. कंधार येथील सुशिक्षित बेकार युवकाने सव्वाचार एकर माळरान जमिनीवर हळद लागवड केली आहे. डोंगराळ शेती हिरव्या शालूने नटली असून, पिवळे सोने शिवारभर बहरले असून सात लाख उत्पन्न काढण्यासाठी गोविंदराव संग्राम गायकवाड यांनी संकल्प केला आहे.

कंधार तालुका बालाघाट डोंगराच्या पर्वतरागांनी व्यापला आहे. गाव तेथे टेकडीने नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे; परंतु शेती, पाणी, रस्ता या समस्यांचा सामना करीत विकासाचे टप्पे गाठणे कठीण जाते. कळका गाव याला अपवाद नाही. गोविंदराव गायकवाड यांनी माळरान, उंच ठिकाणी असलेल्या शेतीला वहितीखाली आणण्याचा निर्धार केला. सव्वाचार एकर जमिनीवरील दगड काढणे कठीण व खर्चिक होते. भाऊ डॉ़ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आर्थिक सहकार्य, मार्गदर्शन केले. त्यामुळे उत्साह वाढला. यानंतर ते कामाला लागले.

शेतातील दगड, गोटे काढणे म्हणावे तेवढे सोपे काम नव्हते. एवढ्या मोठ्या शेतातील दगड-गोटे काढण्यासाठी बराच खर्च येणार होता. मात्र, गायकवाड यांचा निर्धार पक्का होता. भावाने केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे गोविंदराव यांनी ५० ट्रॅक्टर, दगड-गोटे शेतीतून काढले. यानंतर मशागत करून जमीन लागवडयोग्य केली. दुसरी समस्या होती पाण्याची. तेथे पाण्याची सोय नसल्याने त्यांनी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बारूळ धरणातून पाईपलाईन टाकून पाणी शेतावर आणले. यानंतर त्यांनी या शेतात हळद लागवडीचा निश्चय केला. हळद लागवडीबाबत सर्व माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी सेलम जातीच्या बेण्याची निवड करून लागवड केली.

रासायनिक व सेंद्रिय खताचा वापर केला. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील डॉ. आपेट यांच्या मार्गदर्शनखाली रोगनियंत्रण, पोषण, मशागत करण्यात येऊ लागली. जून महिन्यात लागवड केलेली हळद ५ फुटांची उंच झाली. कंदवाढीसाठी जीव अमृतचा वापर फलद्रूप झाला. गोविंदराव यांना पत्नी अल्का गायकवाड, गुणाजी गायकवाड यांची मशागतीला साथ मिळाली.एकूण लागवडीचा खर्च दीड लाख झाला आहे. वाफा पद्धतीने ठिबक पाणी खर्च सत्तर हजार झाला.

आता हळद पिकाने शिवार फुलले आहे. प्रतिक्विंटल भाव ६ ते ७ हजार आहे. एकरी ३० ते ३५ क्विंटल हळद उतारा निघेल. बेणे ठेवून विक्रीसाठी हळद १०० क्विंटल येईल. सात लाखांचे उत्पन्न निघेल. एवढी मेहनत युवकाने केली आहे. तीन महिन्यांनंतर हळद काढणी होईल. त्यावेळी शेती किफायतशीर राहते. हे सिद्ध करण्यासाठी हा युवक मशागत करीत आहे. माळरानावर शेती फुलवून मन्याड खोऱ्यात नवा अध्याय रचन्यासाठी परिश्रम घेताना कोणतीच कसर तो सोडत नाही. शेती हिरवी करून उत्पन्न काढणे सोपे नाही. ही जाणीव असताना सहजपणे न घेता श्रम, जिद्द, संयम, आत्मविश्वास, सहकार्य आदींच्या बळावर गायकवाड यांनी आव्हान तडीला नेले. असा माळरानावरील शेतीचा प्रयोग कुतूहलाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी