शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

आदिवासी तरुण, तरुणींवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:32 IST

राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील २१ जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीसाठी ६८५ इतक्या चालक, वाहक पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात आदिवासी भाग असलेल्या किनवट येथील ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने या भरती प्रक्रियेत किनवट भागातील आदिवासी तरुण, तरुणींवर अन्याय होणार असल्याची तक्रार मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी राज्यपालांसह परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळातील भरती : राज्यपालांसह परिवहन मंत्र्यांना पाठविले पत्र

नांदेड : राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील २१ जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीसाठी ६८५ इतक्या चालक, वाहक पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात आदिवासी भाग असलेल्या किनवट येथील ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने या भरती प्रक्रियेत किनवट भागातील आदिवासी तरुण, तरुणींवर अन्याय होणार असल्याची तक्रार मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी राज्यपालांसह परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.परिवहन महामंडळाने १४ फेब्रुवारी रोजी वाहक, चालक पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दुसरीकडे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारीपर्यंतच ठेवलेली होती. त्यामुळे या २४ ते ४८ तासांत गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही जाहिरात पोहोचणार कधी आणि ते अर्ज करणार कधी ? असा प्रश्नही डॉ. बेलखोडे यांनी उपस्थित केला आहे. जास्तीत जास्त आदिवासी बांधवांना अर्ज करता यावेत यासाठी ही मुदत वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबरोबरच आदिवासींसाठी सुरु केलेल्या ‘आदिवासी ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्रा’ चा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. २० वर्षांपूर्वी किनवट येथे सदर केंद्र सुरु करण्यात आले होते.पुढे हे केंद्र जसेच्या तसे म्हणजे अगदी नावासह नांदेड येथे स्थलांतरीत करण्यात आले व कालांतराने ते बंदही पाडले. या प्रशिक्षण केंद्रावर सन २००० मध्ये ५५ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण झाले असून, २४३ विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत. हे केंद्र बंद पडल्याने प्रतीक्षा यादीही कागदावरच राहिली आहे. सदर प्रशिक्षण केंद्र शासनाने प्राधान्याने किनवट येथे स्थलांतरीत करुन कार्यान्वित करण्याची गरज बेलखोडे यांनी व्यक्त केली. वैधानिक विकास मंडळाच्या मागासवर्गीय कल्याण, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विशेष समितीने २८ जानेवारीच्या बैठकीत सदर प्रशिक्षण केंद्र स्थलांतरीत करण्याबद्दलचा ठराव घेतला आहे. परिवहन खात्यासोबतच आदिवासी विकास विभागानेही आदिवासी तरुण-तरुणींच्या भवितव्याचा विचार करुन यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही डॉ. बेलखोडे यांनी केली आहे.परिवहन महामंडळाने १४ फेब्रुवारी रोजी वाहक, चालक पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दुसरीकडे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारीपर्यंतच ठेवलेली होती. त्यामुळे या २४ ते ४८ तासांत गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही जाहिरात पोहोचणार कधी आणि ते अर्ज करणार कधी ? डॉ. अशोक बेलखोडे, किनवट

टॅग्स :Nandedनांदेडstate transportराज्य परीवहन महामंडळjobनोकरी