शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

किल्ल्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:37 IST

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन, जतन व विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु २०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी आंनद लुटला. २०१७ साली ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती.

ठळक मुद्देकोट्यवधींचा खर्च होऊनही असुविधा कायम, खंदकात काटेरी झाडांची वाढ

गंगाधर तोगरे ।कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन, जतन व विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु २०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी आंनद लुटला. २०१७ साली ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती. ८ हजार ६६८ पर्यटकांची घट झाली आहे. विविध असुविधेमुळे हा पर्यटक घटण्याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ल्याला १२०० वर्षाचा वैभवशाली वारसा लाभला आहे. २४ एकरवरील विस्तीर्ण किल्ला आकर्षक असा आहे. आतील-बाहेरील बुरूज, राणी महाल, दरबार महल, राजा महल, लाल महल, राजाबाग स्वारगेट, बारूदखाना, अंबरखाना, भव्य अवजड तोफ, कैदखाना आदी पाहून पर्यटक, इतिहास प्रेमी अप्रतिम वास्तूचा आनंद लुटत असतात. काळाच्या ओघात अनेक वास्तुनांं तडे गेले,कांहीचे भग्नावशेष झाले. तरीही मराठवाड्यात नाही तर राज्यात या किल्ल्याचे महत्त्व कायम नजरेत भरणारे आहे.म्हणून पर्यटकांची वर्षभर मोठी वर्दळ असते. किल्ला विकासासाठी लोकमत गत दीड दशकापेक्षा अधिक काळापासून शासन,पुरातत्व विभाग आदीचे लक्ष वेधत आले आहे. ५ वर्षापूर्वी ३ कोटी ४० लाख ७८ हजाराचा निधी मंजूर झाला. त्यात सुरक्षा कक्ष,तिकीट घर,पर्यटक आगमन, सुविधा केंद्र, पादचारी रस्ता, प्रसाधनगृह, कारंजे पुल, फुड प्लाझा, वाहनतळ, कुंपनभिंत आदी कामाचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात कामे झाली. परंतु त्याचे उद्घाटन व वापर होण्यापूर्वीच ते जुने होण्याच्या मार्गावर आहेत.मागील वर्षी भुईकोट किल्ला संवर्धन व दुरूस्ती करता पावणे पाच कोटीच्या कामातून अनेक कामे झाली. चूना व वीट बांधकाम, लाकडी काम, दगडी बांधकामाने कांही वास्तुला झळाळी आली. या कामाने पर्यटकात मोठी वाढ होईल. अशा चर्चेने जोर धरला. परंतु २०१७ च्या तुलनेत घट झाली आहे.२०१७ मध्ये १लाख ३ हजार ३४५ पर्यटकांनी भेटीचा आंनद लुटला. आणि २०१८ सालात ९४ हजार ६७७ संख्या राहीली. ८ हजार ६६८ संख्या घटली. हे असे कसे झाले. यावर असुविधा विषयी तर्कवितर्क काढले जात आहेत.किल्ल्यालगत असलेल्या खंदकात काटेरी झाडाची बेसुमार वाढ झाली आहे. त्यामुळे वास्तु सौंदर्य झाकोळले आहे. सुरक्षा बेभरोशाची असून पोलीस चौकी नाही. माहिती फलक नावालाच असून त्यावरील माहितीचा बोध होणे कठीण झाले आहे.खंदक पाण्या अभावी कोरडा आहे. मुर्ती शिल्पे उघडयावर ऊन, पावसाचे चटके सहन करत आहेत.वस्तुसंग्रहालय सोय नाही, बगीचा नाही, पिण्याचे पाणी नाही. विशेष म्हणजे गाईड नसल्याने किल्ला माहीती पर्यटकांना योग्य मिळत नाही. त्यातच कर्मचाऱ्यांची मोठी वाणवा आहे.८ हजारांवर पर्यटकांची घट२०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी भूईकोट किल्ल्यास भेट देवून आनंद लुटला़ २०१७ मध्ये ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती़ ८ हजार ६६८ पर्यटकांची घट झाली आहे़ मागील वर्षी भूईकोट किल्ला संवर्धन व दुरूस्तीसाठी पावने पाच कोटीच्या कामातून अनेक कामे करण्यात आली आहेत़

टॅग्स :NandedनांदेडFortगडtourismपर्यटन