शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

भोकर उड्डाणपुलाच्या कामात रेल्वेची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:36 IST

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तयार होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडल्याने आणखी किती काळ वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

भोकर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तयार होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडल्याने आणखी किती काळ वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुदखेड - आदिलाबाद रेल्वे मार्गावरील मालवाहतूक व प्रवासी रेल्वेची संख्या भरपूर असल्याने वारंवार रेल्वे फाटक लागून वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने उड्डाणपूल मंजूर झाला. दीड वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली. यातील रेल्वे रुळावरील पुलाचे काम रेल्वे प्रशासनाकडून तर उर्वरित काम राज्य शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने होत आहे. दीड वर्षांपूर्वी सुरु झालेले शहरातील रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून होणाºया रेल्वे रुळावरील पुलाच्या कामाला अद्यापही सुरुवातच झाली नाही. संबंधित कंत्राटदाराने काम सुरु करण्यासाठी नारळ फोडण्याची घाई केली़ परंतु प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरवात केली नाही. यामुळे उड्डाणपुलाचे काम कधी संपणार याची प्रतीक्षा लागली आहे.अर्धवट कामामुळे मागील दीड वर्षांपासून वाहतूक कोंडी सोबतच धुळीचा त्रास होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांना आणखी किती काळ उड्डाणपुलाची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत असून रेल्वे प्रशासनाकडे असलेल्या उड्डाणपुलाचे काम करणाºया कंपनी कंत्राटदारास लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी चर्चा होत आहे.

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वे