शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भोकर उड्डाणपुलाच्या कामात रेल्वेची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:36 IST

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तयार होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडल्याने आणखी किती काळ वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

भोकर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तयार होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडल्याने आणखी किती काळ वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुदखेड - आदिलाबाद रेल्वे मार्गावरील मालवाहतूक व प्रवासी रेल्वेची संख्या भरपूर असल्याने वारंवार रेल्वे फाटक लागून वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने उड्डाणपूल मंजूर झाला. दीड वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली. यातील रेल्वे रुळावरील पुलाचे काम रेल्वे प्रशासनाकडून तर उर्वरित काम राज्य शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने होत आहे. दीड वर्षांपूर्वी सुरु झालेले शहरातील रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून होणाºया रेल्वे रुळावरील पुलाच्या कामाला अद्यापही सुरुवातच झाली नाही. संबंधित कंत्राटदाराने काम सुरु करण्यासाठी नारळ फोडण्याची घाई केली़ परंतु प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरवात केली नाही. यामुळे उड्डाणपुलाचे काम कधी संपणार याची प्रतीक्षा लागली आहे.अर्धवट कामामुळे मागील दीड वर्षांपासून वाहतूक कोंडी सोबतच धुळीचा त्रास होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांना आणखी किती काळ उड्डाणपुलाची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत असून रेल्वे प्रशासनाकडे असलेल्या उड्डाणपुलाचे काम करणाºया कंपनी कंत्राटदारास लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी चर्चा होत आहे.

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वे