शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

किनवट तालुक्यात रेतीअभावी शौचालय, घरकुल कामे थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:38 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेकडो शौचालयाचे व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८४१ घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. तालुक्यात १५ रेती घाट असताना लिलावच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार अवैध रेती उपसा करणाऱ्यांना मोठ्या दंडाच्या रकमेला सामोरे जाण्याच्या भितीने रेतीअभावी शौचालय व घरकुलाची कामे थंडावली असल्याचे चित्र आहे.

गोकुळ भवरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेकडो शौचालयाचे व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८४१ घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. तालुक्यात १५ रेती घाट असताना लिलावच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार अवैध रेती उपसा करणाऱ्यांना मोठ्या दंडाच्या रकमेला सामोरे जाण्याच्या भितीने रेतीअभावी शौचालय व घरकुलाची कामे थंडावली असल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामावर पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन विभागाने भर दिला आहे. तर दुसरीकडे शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले आहे. शौचालयाची एक हजाराहून अधिक व घरकुलाची ८४१ बांधकामे तालुक्यात सुरु आहेत़ मात्र बांधकामासाठी रेतीच मिळत नसल्याने बांधकाम कसे करावे याची चिंता लाभार्थ्यांना भेडसावू लागली आहे. तर योजना पूर्ण करुन घेऊ पाहणाºया अधिकारी-कर्मचाºयांची मोठी गोची झाली आहे.किनवट तालुक्यात पैनगंगानदीवर येंदापेंदा, परोटी, मारेगाव, भूलजा, किनवट, सिंदगी (मो), रामपूर, खंबाळ, माहेपूर, पांघरा, भंडारवाडी तर मलकापूर खेर्डा, चिखली खुर्द, कोठारी (चि), प्रधानसांगवी या चार नाल्यावर पंधरा रेती घाट आहेत. त्याचा लिलावच न झाल्याने रेतीचा उपसा करणे अवघड बनले आहे. बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु असतानाही रेतीचा अभावाने बांधकाम करुन घेणारे अडचणीत सापडले आहेत. याच संधीचा फायदा घेऊन काही रेती चोरटे रात्री-अपरात्र ट्रॅक्टरच्या साह्याने अवैध रेतीचा उपसा करुन मनमानी भावाने गरजवंतांना ती विकत आहेत.तालुक्यात १५ रेती घाट असून शासन निर्णयानुसार लिलावाकरिता देयसाठा १३ हजार १०० ब्रासचा आहे. मात्र लिलावाअभावी रेतीचा उपसा करणे कठीण बनले आहे. सराईत रेती चोर मात्र असे असतानाही चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा करुन ती रेती मनमानीभावाने विक्री करुन लूट करत आहेत. या रेती घाटाचा अधिकृत लिलाव झाला असता तर गरजवंतांना कमी भावाने रेती मिळून होणारी आर्थिक लूट थांबली असती, अशी चर्चा सुरू आहे़

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानHomeघर