शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

किनवट तालुक्यात रेतीअभावी शौचालय, घरकुल कामे थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:38 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेकडो शौचालयाचे व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८४१ घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. तालुक्यात १५ रेती घाट असताना लिलावच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार अवैध रेती उपसा करणाऱ्यांना मोठ्या दंडाच्या रकमेला सामोरे जाण्याच्या भितीने रेतीअभावी शौचालय व घरकुलाची कामे थंडावली असल्याचे चित्र आहे.

गोकुळ भवरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेकडो शौचालयाचे व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८४१ घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. तालुक्यात १५ रेती घाट असताना लिलावच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार अवैध रेती उपसा करणाऱ्यांना मोठ्या दंडाच्या रकमेला सामोरे जाण्याच्या भितीने रेतीअभावी शौचालय व घरकुलाची कामे थंडावली असल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामावर पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन विभागाने भर दिला आहे. तर दुसरीकडे शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले आहे. शौचालयाची एक हजाराहून अधिक व घरकुलाची ८४१ बांधकामे तालुक्यात सुरु आहेत़ मात्र बांधकामासाठी रेतीच मिळत नसल्याने बांधकाम कसे करावे याची चिंता लाभार्थ्यांना भेडसावू लागली आहे. तर योजना पूर्ण करुन घेऊ पाहणाºया अधिकारी-कर्मचाºयांची मोठी गोची झाली आहे.किनवट तालुक्यात पैनगंगानदीवर येंदापेंदा, परोटी, मारेगाव, भूलजा, किनवट, सिंदगी (मो), रामपूर, खंबाळ, माहेपूर, पांघरा, भंडारवाडी तर मलकापूर खेर्डा, चिखली खुर्द, कोठारी (चि), प्रधानसांगवी या चार नाल्यावर पंधरा रेती घाट आहेत. त्याचा लिलावच न झाल्याने रेतीचा उपसा करणे अवघड बनले आहे. बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु असतानाही रेतीचा अभावाने बांधकाम करुन घेणारे अडचणीत सापडले आहेत. याच संधीचा फायदा घेऊन काही रेती चोरटे रात्री-अपरात्र ट्रॅक्टरच्या साह्याने अवैध रेतीचा उपसा करुन मनमानी भावाने गरजवंतांना ती विकत आहेत.तालुक्यात १५ रेती घाट असून शासन निर्णयानुसार लिलावाकरिता देयसाठा १३ हजार १०० ब्रासचा आहे. मात्र लिलावाअभावी रेतीचा उपसा करणे कठीण बनले आहे. सराईत रेती चोर मात्र असे असतानाही चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा करुन ती रेती मनमानीभावाने विक्री करुन लूट करत आहेत. या रेती घाटाचा अधिकृत लिलाव झाला असता तर गरजवंतांना कमी भावाने रेती मिळून होणारी आर्थिक लूट थांबली असती, अशी चर्चा सुरू आहे़

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानHomeघर