शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

आजचा युवक आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करणारा शिल्पकार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:21 IST

गडकरी म्हणाले, आपल्या देशात कशाचीही कमी नाही. गरज आहे ती त्याला नावीन्यपूर्णतेने सादर करण्याची, नव्या तंत्रज्ञानासह उपयोगात आणण्याची, राष्ट्राचे ...

गडकरी म्हणाले, आपल्या देशात कशाचीही कमी नाही. गरज आहे ती त्याला नावीन्यपूर्णतेने सादर करण्याची, नव्या तंत्रज्ञानासह उपयोगात आणण्याची, राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्याची. हे सर्व करण्यामध्ये आपल्या युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. आज आपण अनेक गोष्टी, अनेक वस्तू आयात करतो. त्यामुळे देशाचा बराच पैसा हा देशाबाहेर जातो. अनेक विकसित देश आपल्याकडून कच्चा माल स्वस्तात घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून तोच माल आपल्याला महागात विकतात आणि श्रीमंत होतात. यापुढे या गोष्टी घडू नयेत, हेच आपल्या युवकांनी मनावर घेतले पाहिजे.

स्वदेशी आणि स्वावलंबनाकडे जाताना देशात नवीन तंत्रज्ञान विकसित करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आज शेती व्यवसायामध्ये आपण अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. पावसाचे पाणी साठविणे अथवा जिरविणे, सोलर एनर्जीचा वापर, ड्रिप एरिगेशन, स्वतःचे स्वस्त बियाणे वापरणे, सेंद्रिय खतांचा वापर, इत्यादी बाबींचा जर आपण नियोजनपूर्वक वापर केला तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.

कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही देशाची सुपर पॉवर दिशेकडे जाण्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. अशा प्रकारे देशाचा सर्वांगीण विकास साधणे अथवा सर्वांगीण प्रगती करणे म्हणजेच ‘आत्मनिर्भर भारत’ होय. आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी विद्यापीठानेही पुढाकार घ्यावा. विद्यापीठाने १०० वर्षे पुढचा विचार करावा. त्यानुसार अभ्यासक्रम तयार करावा. विद्यापीठाने देश सुपर पॉवर बनविण्यासाठीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी सूत्रसंचालन केले; तर कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.