शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

आजचा युवक आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करणारा शिल्पकार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:21 IST

गडकरी म्हणाले, आपल्या देशात कशाचीही कमी नाही. गरज आहे ती त्याला नावीन्यपूर्णतेने सादर करण्याची, नव्या तंत्रज्ञानासह उपयोगात आणण्याची, राष्ट्राचे ...

गडकरी म्हणाले, आपल्या देशात कशाचीही कमी नाही. गरज आहे ती त्याला नावीन्यपूर्णतेने सादर करण्याची, नव्या तंत्रज्ञानासह उपयोगात आणण्याची, राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्याची. हे सर्व करण्यामध्ये आपल्या युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. आज आपण अनेक गोष्टी, अनेक वस्तू आयात करतो. त्यामुळे देशाचा बराच पैसा हा देशाबाहेर जातो. अनेक विकसित देश आपल्याकडून कच्चा माल स्वस्तात घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून तोच माल आपल्याला महागात विकतात आणि श्रीमंत होतात. यापुढे या गोष्टी घडू नयेत, हेच आपल्या युवकांनी मनावर घेतले पाहिजे.

स्वदेशी आणि स्वावलंबनाकडे जाताना देशात नवीन तंत्रज्ञान विकसित करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आज शेती व्यवसायामध्ये आपण अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. पावसाचे पाणी साठविणे अथवा जिरविणे, सोलर एनर्जीचा वापर, ड्रिप एरिगेशन, स्वतःचे स्वस्त बियाणे वापरणे, सेंद्रिय खतांचा वापर, इत्यादी बाबींचा जर आपण नियोजनपूर्वक वापर केला तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.

कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही देशाची सुपर पॉवर दिशेकडे जाण्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. अशा प्रकारे देशाचा सर्वांगीण विकास साधणे अथवा सर्वांगीण प्रगती करणे म्हणजेच ‘आत्मनिर्भर भारत’ होय. आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी विद्यापीठानेही पुढाकार घ्यावा. विद्यापीठाने १०० वर्षे पुढचा विचार करावा. त्यानुसार अभ्यासक्रम तयार करावा. विद्यापीठाने देश सुपर पॉवर बनविण्यासाठीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी सूत्रसंचालन केले; तर कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.