शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बालशौर्य पुरस्कारप्राप्त एजाजवर मोलमजुरीची वेळ; केळीच्या गाड्या भरताना खाकीवर्दीचे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 17:13 IST

National Child Bravery Award Winner Ejaz Nadaf : देशातील सर्व खेळाडूंना व बालशौर्य पुरस्कार प्राप्त असलेल्यांना नोकरीत घेण्याचे प्रावधान आहे.

ठळक मुद्देनववीत असताना त्याने दोन मुलींचे प्राण वाचवण्याचा पराक्रम केला होता. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एजाज नदाफला नोकरी मिळण्याची अपेक्षा

- युनूस नदाफपार्डी ( नांदेड ) : अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील बालशौर्य पुरस्कारप्राप्त एजाज नदाफने बारावीत ८२ टक्के गुण संपादित करून उत्तीर्ण झाला आहे. मात्र, आजही तो घरप्रपंच चालविण्यासाठी केळीच्या गाड्यावर मोलमजुरी करतो. त्याला नोकरी लागेल का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. देशातील सर्व खेळाडूंना व बालशौर्य पुरस्कार प्राप्त असलेल्यांना नोकरीत घेण्याचे प्रावधान आहे. एजाज नदाफने कोणती तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून बारावी उत्तीर्ण झाला. ( Time of wage labor on National Child Bravery Award Winner Ejaz Nadaf) 

नववीत असताना त्याने दोन मुलींचे प्राण वाचवण्याचा पराक्रम केला होता. अर्धापूर तालुक्यातील पार्डी गावाच्या जवळून वाहणाऱ्या नदीच्या बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार मुलींना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या होत्या. आरडाओरडा झाल्याने खेळायला जाणाऱ्या एजाजने मागचा -पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारून चारपैकी दोघींचे प्राण वाचविले. एका मुलीचे प्रेत पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एजाज नदाफने केले होते. 

या शौर्याची दखल घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले होते. राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेल्या एजाज नदाफला सर्व स्थरातून मान - सन्मान मिळाला. सर्वत्र सत्कार करण्यात आला. मात्र, त्यानंतर एजाज नदाफची कोणीही विचारपूस केली नाही. कोणतीही मदत मिळाली नाही. जिल्हा परिषदेकडून घरकुलाचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही. आताही तो मोडक्या घरात राहात आहे. एजाज नदाफच्या हलाखाली परिस्थितीमुळे केळीच्या गाड्यावर मोलमजुरी करतो.

आर्मी किंवा पोलीसात जाण्याची इच्छाराष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेल्या एजाज नदाफची इच्छा पोलीस किंवा आर्मीत जाण्याची आहे. मात्र, त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. एजाज बारावीत ८२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला असून, केळीच्या गाड्या भरण्याचे काम करीत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसNandedनांदेड