शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'त्या' शिक्षकाची कृषी खात्यातील सेवा निवृत्तीसाठी ग्राह्य धरा; खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:49 IST

शिक्षण आणि कृषी खात्यातील ३८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले शिक्षक राजाराम ऊर्फ राजसाहेब भाऊराव कवाले यांची राजीनाम्यापूर्वीची कृषी खात्यातील नऊ वर्षांची सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. एस.एम. गव्हाणे यांनी दिले आहेत. 

नांदेड : शिक्षण आणि कृषी खात्यातील ३८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले शिक्षक राजाराम ऊर्फ राजसाहेब भाऊराव कवाले यांची राजीनाम्यापूर्वीची कृषी खात्यातील नऊ वर्षांची सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. एस.एम. गव्हाणे यांनी दिले आहेत. 

राजाराम कवाले यांनी कृषी विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून २ डिसेंबर १९६७ ते २ सप्टेंबर १९७८ यादरम्यान नोकरी केली. ते नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये २ सप्टेंबर १९७८ ला रुजू झाले. दोन्ही विभागांमधील ३८ वर्षांच्या सेवेनंतर कवाले १० आॅगस्ट २००६ रोजी निवृत्त झाले. लातूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे त्यांच्या दोन्ही सेवांचा ३८ वर्षांच्या सेवेचा प्रस्ताव निवृत्तीवेतनासाठी पाठविण्यात आला. उपसंचालकांनी केवळ शिक्षण विभागातील त्यांच्या २९ वर्षांच्या सेवेच्या आधारे त्रुटीची पूर्र्तता करण्याच्या अटीवर सदर प्रस्ताव ३८ वर्षांच्या सेवेच्या अधिकारास अधीन राहून पाठविला होता. 

त्यांनी नागपूर येथील महालेखाकारांकडे प्रस्ताव पाठविला. तो त्यांनी नामंजूर केला. यानंतर याचिकाकर्त्यांनी उपसंचालक लातूर यांच्याकडे खंड क्षमापित करण्यासाठी निवेदन सादर केले. परंतु याचिकाकर्त्यास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अ‍ॅड. विठ्ठलराव सलगरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयातील मधुकर विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणाचा संदर्भ देत शासन निर्णय १८ डिसेंबर १९८५, २८ सप्टेंबर १९८९ आणि १३ मार्च १९९२ विचारात घेऊन एक दिवसाचा नाममात्र सेवाखंड क्षमापित करता येतो. 

महाविद्यालयाने शिफारस केल्याप्रमाणे ३८ वर्षांच्या एकूण सेवेच्या ३३ वर्षे मर्यादेत याचिकाकर्ता निवृत्तीवेतनास पात्र ठरतो,               असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले. प्रकरणात संस्थेतर्फे अ‍ॅड. एस.व्ही. नातू आणि शासनाच्या वतीने अ‍ॅड. सिद्धार्थ यावलकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAgriculture Sectorशेती क्षेत्र