शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मुसळधार पावसाने स्मशानभूमी गेली पाण्याखाली; मृतावर भर रस्त्यावर केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 18:45 IST

पुलाची उंची कमी असल्याने हा भाग नेहमी पाण्याखाली जातो

अर्धापूर ( नांदेड ): स्वर्गाची वाट ही बिकटच असल्याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील शेलगाव ता. अर्धापूर येथील ग्रामस्थांना आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमी नसल्याने नागरिक त्रस्त होते. गतवर्षी नदीकाठी स्मशानभूमी मिळाली आहे. पण, मुसळधार पावसाने स्मशानभूमी पाण्याख्याली गेल्याने अंत्यसंस्कार कसे करावे ? हा प्रश्न शेलगावकरांना पडला. अखेर कमरे इतक्या पाण्यातून वाट शोधत भर रस्त्यावर मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शेलगाव (बु) व (खु) या दोन्ही गावांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा बसतो. आज तब्बल २४ तासांपासून गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. चार दिवसात दोन वेळा पूर आल्याने शालेय विद्यार्थी, रुग्ण व शेतीची दळणवळणाची कामे सर्व व्यवहार ठप्प झाली आहेत. दरम्यान, तालुक्यातील शेलगाव येथील ५० वर्षीय महिला कमलबाई मारोती राजेगोरे यांचे मंगळवारी निधन झाले. मुसळधार पावसामुळे नदीकाठी असलेली स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न उभा राहिला. अखेर कमरे इतक्या पाण्यातून वाट काढत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृत महिलेवर रस्त्यावर अंत्यसंस्कार केले. 

अनेक नातेवाईक अंत्यविधीला मुकलेगावाला पुराने वेढा घातला असल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने निकटवर्ती नातेवाईक अंत्यसंस्कारापासून मुकले आहेत. दरम्यान, पर्यायी रस्ता नसल्याने यापूर्वी अनेकांना योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत. दरवर्षीच पावसाळ्यात अशा समस्या येत असल्याने पर्यायी रस्ता केंव्हा मिळणार? पूर परिस्थितीत फरफट केव्हा संपणार? असा सवाल शेलगावकर करीत आहेत. 

रुंदीकरण करून पूल उभारावा रुग्णांसह शालेय विद्यार्थ्यांना पुराचा मोठा फटका बसत असून शासनाने शेलगाव बु.व खु. येथील नदीचे रुंदीकरण करावे.तसेच नदीवर मोठा पूल उभारावा.- उध्दवराव राजेगोरे, राष्ट्रवादी काँग्रेस ता.अध्यक्ष अर्धापूर

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस