शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे ते लग्न झालेच नाही

By प्रसाद आर्वीकर | Updated: April 24, 2023 19:52 IST

चाइल्डलाइन पथकाने लग्न मुहूर्तापूर्वीच गाव गाठून हा बालविवाह रोखला आहे.

नांदेड : अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे एक बालविवाह होणार होता. त्याची कुणकुण नांदेडच्या चाइल्डलाइन पथकाला मिळाली. पथकाने लग्न मुहूर्तापूर्वीच गाव गाठून हा बालविवाह रोखला आहे.

राज्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू आहे. १८ वर्षांपूर्वी मुलीचा विवाह लावणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी ग्रामीण भागात सर्रास बालविवाह लावले जात आहेत. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दि. २२ एप्रिल रोजी अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे बालविवाह होणार असल्याची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावरून चाइल्डलाइनला मिळाली. या माहितीच्या आधारे चाइल्डलाइनच्या अर्चना केसकर आणि दीपाली हिंगोले यांनी बीट जमादार बालाजी तोरणे, आगलावे यांच्यासह बारसगाव गाठले. मुलीच्या घरी जाऊन बालविवाह कायद्याची माहिती दिली.

१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलीचे लग्न करू शकता, असे पालकांना सांगितले. यावेळी पोलिसपाटील सुनील मोरे, ग्रामपंचायत सदस्य गोदावरी बारसे, अंगणवाडी ताई गंगाबाई, रंजना काळे, ग्रामसेवक गणेश आडे यांच्याशी संपर्क साधून हा विवाह रोखण्यात आला. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीचे लग्न करणार असे हमीपत्र घेण्यात आले. त्यामुळे एक बालविवाह रोखला गेला आहे.

टॅग्स :marriageलग्नNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी