शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे ते लग्न झालेच नाही

By प्रसाद आर्वीकर | Updated: April 24, 2023 19:52 IST

चाइल्डलाइन पथकाने लग्न मुहूर्तापूर्वीच गाव गाठून हा बालविवाह रोखला आहे.

नांदेड : अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे एक बालविवाह होणार होता. त्याची कुणकुण नांदेडच्या चाइल्डलाइन पथकाला मिळाली. पथकाने लग्न मुहूर्तापूर्वीच गाव गाठून हा बालविवाह रोखला आहे.

राज्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू आहे. १८ वर्षांपूर्वी मुलीचा विवाह लावणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी ग्रामीण भागात सर्रास बालविवाह लावले जात आहेत. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दि. २२ एप्रिल रोजी अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे बालविवाह होणार असल्याची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावरून चाइल्डलाइनला मिळाली. या माहितीच्या आधारे चाइल्डलाइनच्या अर्चना केसकर आणि दीपाली हिंगोले यांनी बीट जमादार बालाजी तोरणे, आगलावे यांच्यासह बारसगाव गाठले. मुलीच्या घरी जाऊन बालविवाह कायद्याची माहिती दिली.

१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलीचे लग्न करू शकता, असे पालकांना सांगितले. यावेळी पोलिसपाटील सुनील मोरे, ग्रामपंचायत सदस्य गोदावरी बारसे, अंगणवाडी ताई गंगाबाई, रंजना काळे, ग्रामसेवक गणेश आडे यांच्याशी संपर्क साधून हा विवाह रोखण्यात आला. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीचे लग्न करणार असे हमीपत्र घेण्यात आले. त्यामुळे एक बालविवाह रोखला गेला आहे.

टॅग्स :marriageलग्नNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी