शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दहा हजारांवर शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 18:36 IST

हमीभावाने तूर खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ देवूनही आॅनलाईन नोंदणी केलेल्या नांदेड जिल्ह्यातील १० हजार ६४३ शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे अद्याप शिल्लक आहे.

- श्रीनिवास भोसले 

नांदेड : हमीभावाने तूर खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ देवूनही आॅनलाईन नोंदणी केलेल्या नांदेड जिल्ह्यातील १० हजार ६४३ शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे अद्याप शिल्लक असल्याने हजारो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडूनच आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत नोंदणी केलेल्या १५ हजार १०४ शेतकऱ्यांकडून १ लाख ५३ हजार ८२४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ 

मराठवाड्यात यंदा तूरीचे विक्रमी उत्पादन झाले़ त्यात नांदेडचादेखील समावेश आहे़ जवळपास तूर उत्पादक शेतकऱ्यांना  प्रतिएकरी आठ ते बारा क्विंटलचा उतारा आला़ बाजारात हमीभावापेक्षा अत्यंत कमी भाव मिळत आहे़ कवडीमोल भावाने तूर विक्री करण्यापेक्षा शासनाच्या हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यास प्राधान्य दिले़ यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती़ 

जिल्ह्यात जवळपास २५ हजार ७४७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली़ यातील १५ हजार १०४ शेतकऱ्यांकडून आजपर्यंत तूर खरेदी करण्यात आली़ तूर खरेदीमध्ये वारंवार येणाऱ्या अडथळ्यामुळे जिल्ह्यातील तूर खरेदी नेहमीच वादात राहिली़ कधी जागेचा प्रश्न तर कधी बारदाना उपलब्ध नसल्याने तूर खरेदी ब्रेक लागला होता़ दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५३ हजार ८२४ क्विंटल तूरीची शासनाकडून खरेदी करण्यात आली़ यामध्ये नांदेड तालुक्यातील हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १७ हजार ३८७ क्विंटल, नायगाव- १९ हजार ४५६ क्विंटल, लोहा- ११ हजार १२ क्विंटल, बिलोली- २३ हजार ५५७ क्विंटल, देगलूर- २८ हजार १०३ क्विंटल, मुखेड - १६ हजार ४२७ क्विंटल, किनवट - १४ हजार ८२० क्विंटल, भोकर - १२ हजार ११२ क्विंटल, हदगाव - १० हजार ९४७ क्विंटल तूरीची खरेदी करण्यात आली आहे़ परंतु, आजही हजारो शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे़ शासनाने अंतिम मुदत दिल्याने  १५ मे पासून खरेदी केंद्र बंद केली आहेत़ नोंदणी करूनदेखील शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नसल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे खरिपातील कापूस पीक बोंडअळीेने फस्त केले़ त्यामुळे सोयाबीन, मुग आणि उडीद यासह तूर पिकावरच शेतकऱ्यांची मदार आहे.  

शासनाकडून ५ हजार २५० रुपये हमी दर व २०० रुपये बोनस असा  एकूण ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे़ तसेच हेक्टरी बारा क्विंटलचा उतारा गृहीत धरून खरेदी  करण्यात येत होती़ त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये समाधान होते़ परंतु, १५ मेपर्यंत जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे झाले़ तर उर्वरित १० हजाराहून अधिक शेतकरी अद्याप शिल्लक आहेत़ त्यांच्याकडे असलेली तूर शासन घेणार की त्यांना ती कवडीमोल भावाने खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे़ 

शेतकरी संभ्रमावस्थेतबाजारात सध्या तूरीला ३७०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे़ शासनाकडून जवळपास साडेपाच हजार रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला़ परंतु, खरेदी बंद झाल्याने  शेतकरी तूर कुठे विक्री करावी या संभ्रामावस्थेत सापडला आहे़ नोंदणी करूनदेखील तूर विक्री न झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़ शासनाने नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, मुदत संपल्याने नाफेडने हात वर केल्याने शासन तूर खरेदी करणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड