शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नांदेड जिल्ह्यात दहा हजारांवर शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 18:36 IST

हमीभावाने तूर खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ देवूनही आॅनलाईन नोंदणी केलेल्या नांदेड जिल्ह्यातील १० हजार ६४३ शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे अद्याप शिल्लक आहे.

- श्रीनिवास भोसले 

नांदेड : हमीभावाने तूर खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ देवूनही आॅनलाईन नोंदणी केलेल्या नांदेड जिल्ह्यातील १० हजार ६४३ शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे अद्याप शिल्लक असल्याने हजारो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडूनच आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत नोंदणी केलेल्या १५ हजार १०४ शेतकऱ्यांकडून १ लाख ५३ हजार ८२४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ 

मराठवाड्यात यंदा तूरीचे विक्रमी उत्पादन झाले़ त्यात नांदेडचादेखील समावेश आहे़ जवळपास तूर उत्पादक शेतकऱ्यांना  प्रतिएकरी आठ ते बारा क्विंटलचा उतारा आला़ बाजारात हमीभावापेक्षा अत्यंत कमी भाव मिळत आहे़ कवडीमोल भावाने तूर विक्री करण्यापेक्षा शासनाच्या हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यास प्राधान्य दिले़ यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती़ 

जिल्ह्यात जवळपास २५ हजार ७४७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली़ यातील १५ हजार १०४ शेतकऱ्यांकडून आजपर्यंत तूर खरेदी करण्यात आली़ तूर खरेदीमध्ये वारंवार येणाऱ्या अडथळ्यामुळे जिल्ह्यातील तूर खरेदी नेहमीच वादात राहिली़ कधी जागेचा प्रश्न तर कधी बारदाना उपलब्ध नसल्याने तूर खरेदी ब्रेक लागला होता़ दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५३ हजार ८२४ क्विंटल तूरीची शासनाकडून खरेदी करण्यात आली़ यामध्ये नांदेड तालुक्यातील हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १७ हजार ३८७ क्विंटल, नायगाव- १९ हजार ४५६ क्विंटल, लोहा- ११ हजार १२ क्विंटल, बिलोली- २३ हजार ५५७ क्विंटल, देगलूर- २८ हजार १०३ क्विंटल, मुखेड - १६ हजार ४२७ क्विंटल, किनवट - १४ हजार ८२० क्विंटल, भोकर - १२ हजार ११२ क्विंटल, हदगाव - १० हजार ९४७ क्विंटल तूरीची खरेदी करण्यात आली आहे़ परंतु, आजही हजारो शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे़ शासनाने अंतिम मुदत दिल्याने  १५ मे पासून खरेदी केंद्र बंद केली आहेत़ नोंदणी करूनदेखील शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नसल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे खरिपातील कापूस पीक बोंडअळीेने फस्त केले़ त्यामुळे सोयाबीन, मुग आणि उडीद यासह तूर पिकावरच शेतकऱ्यांची मदार आहे.  

शासनाकडून ५ हजार २५० रुपये हमी दर व २०० रुपये बोनस असा  एकूण ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे़ तसेच हेक्टरी बारा क्विंटलचा उतारा गृहीत धरून खरेदी  करण्यात येत होती़ त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये समाधान होते़ परंतु, १५ मेपर्यंत जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे झाले़ तर उर्वरित १० हजाराहून अधिक शेतकरी अद्याप शिल्लक आहेत़ त्यांच्याकडे असलेली तूर शासन घेणार की त्यांना ती कवडीमोल भावाने खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे़ 

शेतकरी संभ्रमावस्थेतबाजारात सध्या तूरीला ३७०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे़ शासनाकडून जवळपास साडेपाच हजार रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला़ परंतु, खरेदी बंद झाल्याने  शेतकरी तूर कुठे विक्री करावी या संभ्रामावस्थेत सापडला आहे़ नोंदणी करूनदेखील तूर विक्री न झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़ शासनाने नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, मुदत संपल्याने नाफेडने हात वर केल्याने शासन तूर खरेदी करणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड