शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

K Chandrashekar Rao Live: “धर्म, जातीयवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय, परिवर्तन काळाची गरज”; केसीआर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 18:22 IST

K Chandrashekar Rao Live: देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते, या शब्दांत केसीआर यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

K Chandrashekar Rao Live: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी 'अब कि बार किसान सरकार'चा नारा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. यावेळी अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.  

विचारधारा बदलली तर भारत बदलेल. भारताला बदलण्यासाठी आमचा पक्ष खूप प्रयत्न करेल. देशात पाण्याचा मुभलक साठा आहे. कोणत्याच सरकारने कधीच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही. देशात पाण्याची मोठी समस्या असून, केंद्र सरकार फक्त तमाशा बघत आहे. तसेच देशाच्या कोणत्याही राज्यात २४ तास वीज मिळत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी मिळत नाही. शेतकऱ्यांना तर शेतीसाठी वीज मिळत नाही. दिवसा, रात्री कधीही वीज जाते. दिवसातून चार-पाच वेळा वीज जाते. अशी परिस्थिती निर्माणच का व्हावी, अशी विचारणा के. चंद्रशेखर राव यांनी केली. 

मोठ-मोठी भाषणे, खोटी आश्वासने या गोष्टी देशातील जनता किती दिवस ऐकणार

मोठ-मोठी भाषणे, खोटी आश्वासने या गोष्टी देशातील जनता किती दिवस ऐकणार, कधीपर्यंत हे सगळे चालणार, असा प्रश्न उपस्थित करत, देशातील जनतेला आणि तरुणांना, युवकांना आम्ही विनंती करतो की, हा परिवर्तनचा काळ आहे. देशात परिवर्तन झाले पाहिजे. देशवासीयांचा संयम सुटला तर उलट-सुलट परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे सांगत केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. 

जगाच्या तुलनेने आपण प्रत्येक क्षेत्रात मागे आहोत

भारत देश पाणी, वीज, पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात मागे पडत चालला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही अनेक समस्या आहेत. या देशात नेमके काय घडतेय, असा सवाल केसीआर यांनी केला. यासाठी देशातील तरुणांना, बुद्धिजीवींना आवाहन आम्ही आवाहन करतो की, हा परिवर्तनाचा काळ आहे. देशातील चुकीच्या गोष्टी थांबायला हव्यात. देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते, या शब्दांत केसीआर यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

 धर्म, जातीवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय

देशातील जनतेला खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. धर्म आणि जातीवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जात आहे. मनमानीपणा सुरू आहे. अशाने आपला देश कुठे जाणार, प्रगती कशी करणार, जगातील इतर देशांची स्पर्धा करत पुढे कसा जाणार, हीच देशातील सत्य परिस्थिती आहे. देशातील जनता, मीडिया परिवर्तनासाठी मोठे योगदान देऊ शकते, असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. 

दरम्यान, देशातील मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा स्पीड सरासरी २४ किमी प्रति तास आहे. तर चीनमधील मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा स्पीड सरासरी १२० किमी प्रति तास आहे. अशा परिस्थितीत आपण चीनशी कशी स्पर्धा करणार, या गोष्टी शक्य तरी आहेत का, अशी विचारणाही केसीआर यांनी केली.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडPoliticsराजकारण