शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

K Chandrashekar Rao Live: “धर्म, जातीयवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय, परिवर्तन काळाची गरज”; केसीआर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 18:22 IST

K Chandrashekar Rao Live: देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते, या शब्दांत केसीआर यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

K Chandrashekar Rao Live: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी 'अब कि बार किसान सरकार'चा नारा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. यावेळी अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.  

विचारधारा बदलली तर भारत बदलेल. भारताला बदलण्यासाठी आमचा पक्ष खूप प्रयत्न करेल. देशात पाण्याचा मुभलक साठा आहे. कोणत्याच सरकारने कधीच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही. देशात पाण्याची मोठी समस्या असून, केंद्र सरकार फक्त तमाशा बघत आहे. तसेच देशाच्या कोणत्याही राज्यात २४ तास वीज मिळत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी मिळत नाही. शेतकऱ्यांना तर शेतीसाठी वीज मिळत नाही. दिवसा, रात्री कधीही वीज जाते. दिवसातून चार-पाच वेळा वीज जाते. अशी परिस्थिती निर्माणच का व्हावी, अशी विचारणा के. चंद्रशेखर राव यांनी केली. 

मोठ-मोठी भाषणे, खोटी आश्वासने या गोष्टी देशातील जनता किती दिवस ऐकणार

मोठ-मोठी भाषणे, खोटी आश्वासने या गोष्टी देशातील जनता किती दिवस ऐकणार, कधीपर्यंत हे सगळे चालणार, असा प्रश्न उपस्थित करत, देशातील जनतेला आणि तरुणांना, युवकांना आम्ही विनंती करतो की, हा परिवर्तनचा काळ आहे. देशात परिवर्तन झाले पाहिजे. देशवासीयांचा संयम सुटला तर उलट-सुलट परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे सांगत केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. 

जगाच्या तुलनेने आपण प्रत्येक क्षेत्रात मागे आहोत

भारत देश पाणी, वीज, पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात मागे पडत चालला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही अनेक समस्या आहेत. या देशात नेमके काय घडतेय, असा सवाल केसीआर यांनी केला. यासाठी देशातील तरुणांना, बुद्धिजीवींना आवाहन आम्ही आवाहन करतो की, हा परिवर्तनाचा काळ आहे. देशातील चुकीच्या गोष्टी थांबायला हव्यात. देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते, या शब्दांत केसीआर यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

 धर्म, जातीवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय

देशातील जनतेला खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. धर्म आणि जातीवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जात आहे. मनमानीपणा सुरू आहे. अशाने आपला देश कुठे जाणार, प्रगती कशी करणार, जगातील इतर देशांची स्पर्धा करत पुढे कसा जाणार, हीच देशातील सत्य परिस्थिती आहे. देशातील जनता, मीडिया परिवर्तनासाठी मोठे योगदान देऊ शकते, असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. 

दरम्यान, देशातील मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा स्पीड सरासरी २४ किमी प्रति तास आहे. तर चीनमधील मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा स्पीड सरासरी १२० किमी प्रति तास आहे. अशा परिस्थितीत आपण चीनशी कशी स्पर्धा करणार, या गोष्टी शक्य तरी आहेत का, अशी विचारणाही केसीआर यांनी केली.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडPoliticsराजकारण