शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उन्हाचा पारा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:21 IST

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे़ उन्हाचे चटके सहन करीत खाजगी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत.

ठळक मुद्देउन्हातील शाळांमुळे विद्यार्थ्यांचे बेहाल

बिलोली : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे़ उन्हाचे चटके सहन करीत खाजगी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. दुपारच्या सत्रातील शाळांमुळे विद्यार्थ्यांचे बेहाल होत असल्याने पालकांनी या शाळा सकाळी भरविण्याची मागणी केली आहे़उन्हाळ्याच्या झळा चिमुकल्या मुलांना सोसाव्या लागत असल्याने पालकांची कोंडी झाली आहे़ एकीकडे पारा वाढत असताना सुरु असलेल्या शाळा चिमुकल्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत.मार्च महिना मध्यावर असताना पारा ३७, ३८ अंशाच्या वर गेल्याने मे महिन्यात काय स्थिती राहणार असेल, याची कल्पना येवू शकते. सातत्याने वाढणारे ऊन आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. उन्हापासून काळजी न घेतल्यास धोकाही संभवू शकतो. या सर्व परिस्थितीची जाणीव असतानाही तालुक्यातील इंग्रजी खाजगी शाळा मात्र सर्रास सुरु आहेत. तालुक्यात ९ इंग्रजी खाजगी शाळा असून विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे़विशेष करुन, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आजही चिमुकल्यांना नाईलाजास्तव जावे लागत आहे. वाढते ऊन पाहता जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत शाळा संपविल्या जातात.मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळा दुपारी १२ ते २ या दरम्यान सोडल्या जात असल्याने भर उन्हात सूर्य आग ओकत असताना विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जावे लगत आहे. या उन्हाचे दुष्परिणाम बऱ्याच विद्यार्थांना जाणवू लागले आहे. या शाळा अजूनही काही दिवस सुरु राहणार असल्याचे समजते.विद्यार्थ्यांचा त्रास लक्षात घेवून नियोजन करावेइंग्रजी शाळांना सुट्या देण्याच्या संदर्भात शासन आदेश नसल्याचे यासंदर्भात अधिकारी सांगतात. मात्र, भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, स्थानिक पातळीवर विद्यार्थी हिताचे निर्णय घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आज मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक भरउन्हात विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असले तरी, बऱ्याच पालकांना विद्यार्र्थ्यांचीही उन्हाळ्यातील शाळा त्रासदायक ठरत आहे़सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याची मागणीमाझी मुलगी बिलोलीच्या इंग्रजी शाळेत पहिल्या वर्गात शिकत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला असल्याकारणाने जि.प.च्या शाळेप्रमाणे इंग्रजी शाळाही सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात़ जेणेकरुन चिमुकल्यांना उन्हाचा त्रास होणार नाही़ यावर्षी उन्हासोबतच दुष्काळाचे चटके सहन करावे लागणार आहेत़ या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे़ -रामदास उडतलवार, पालक, हिंगणी़

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाTemperatureतापमान