शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
3
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
4
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
5
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
6
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
7
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
8
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
9
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
10
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
11
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
12
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
13
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
14
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
15
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
16
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
17
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
18
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
19
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
20
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका

लढ्याला यश ! ५०० शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर मिळाले उसाचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:19 IST

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खाजगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत.

ठळक मुद्देसदर कारखान्याकडे किंवा प्रशासनाकडे थकीत बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही  रेकॉर्ड नव्हते.शेतकऱ्यांनी आपला ऊस गेला व पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी करून पुरावे सादर केले होते.

नांदेड : परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने २०१५-१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नव्हते. शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांच्या लढ्यानंतर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३८२ शेतकऱ्यांची ३१ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खाजगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. नंतरच्या काळात तो कारखाना परस्पर विकला. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारी, ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी हा विषय मंडळाच्या अनेक बैठकींत लावून धरला. कारखान्यावर जप्तीची कारवाई करत अनेक वेळा लिलाव केला; परंतु शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. त्यानंतर भोकर येथील शेतकरी गोविंद गोपालपल्ली यांनी कारखान्याच्या अध्यक्षाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. कारखान्याच्या अध्यक्षाला पन्नास लाख रुपये अनामत ठेवण्याच्या अटीवर जामीन मिळाला.

परंतु  कारखान्याच्या अध्यक्षाने कारखान्यात शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गायब केले. त्यामुळे सदर कारखान्याकडे असलेले ४ कोटी २२ लाख रुपये कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचे, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला होता; परंतु शेतकऱ्यांकडे असलेल्या पावत्यांआधारे नवीन रेकॉर्ड तयार केले व त्याची खातरजमा करून  यादीतील ३८२ शेतकऱ्यांना  ३० लाख ८८ हजार देण्याचा निर्णय राष्ट्रीय बँक प्राधिकरणाने घेतला आहे. हे पैसे अध्यक्षांनी जमा केलेल्या जमानतीसाठीच्या ५० लाख रुपयांतून अदा करण्यात येत असून, सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर साखर सहसंचालक विभागामार्फत टाकण्यास  सुरुवात झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला दिल्यासंदर्भातील पावत्या तपासण्यात येत आहेत. त्यानुसार पैसे देण्यात येणार असल्याचेही विभागीय कार्यालयातून सांगण्यात आले.

रेकॉर्ड नव्याने तयार सदर कारखान्याकडे किंवा प्रशासनाकडे थकीत बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही  रेकॉर्ड नव्हते. नव्याने रेकॉर्ड तयार केले. त्यानुसार ४५९ शेतकऱ्यांनी आपला ऊस गेला व पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी करून पुरावे सादर केले होते.  या सर्वांची खातरजमा करून शेतकऱ्यांच्या वारसदारांचे अर्ज प्राप्त झाले. त्यांना वारस असल्याचा पुरावा देण्यासंदर्भात कळविले आहे. त्यानुसार रक्कम देण्यात येईल, अशी माहिती नांदेडच्या प्रादेशिक साखर विभागाचे बी.एल. वांगे यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडSugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा