शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
2
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
3
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
4
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
5
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
6
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
7
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
8
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
9
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
10
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
11
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
12
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
13
Tanya Mittal : "कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
14
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
15
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
16
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
17
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
18
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
19
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
20
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
Daily Top 2Weekly Top 5

लढ्याला यश ! ५०० शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर मिळाले उसाचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:19 IST

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खाजगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत.

ठळक मुद्देसदर कारखान्याकडे किंवा प्रशासनाकडे थकीत बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही  रेकॉर्ड नव्हते.शेतकऱ्यांनी आपला ऊस गेला व पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी करून पुरावे सादर केले होते.

नांदेड : परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने २०१५-१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नव्हते. शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांच्या लढ्यानंतर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३८२ शेतकऱ्यांची ३१ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खाजगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. नंतरच्या काळात तो कारखाना परस्पर विकला. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारी, ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी हा विषय मंडळाच्या अनेक बैठकींत लावून धरला. कारखान्यावर जप्तीची कारवाई करत अनेक वेळा लिलाव केला; परंतु शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. त्यानंतर भोकर येथील शेतकरी गोविंद गोपालपल्ली यांनी कारखान्याच्या अध्यक्षाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. कारखान्याच्या अध्यक्षाला पन्नास लाख रुपये अनामत ठेवण्याच्या अटीवर जामीन मिळाला.

परंतु  कारखान्याच्या अध्यक्षाने कारखान्यात शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गायब केले. त्यामुळे सदर कारखान्याकडे असलेले ४ कोटी २२ लाख रुपये कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचे, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला होता; परंतु शेतकऱ्यांकडे असलेल्या पावत्यांआधारे नवीन रेकॉर्ड तयार केले व त्याची खातरजमा करून  यादीतील ३८२ शेतकऱ्यांना  ३० लाख ८८ हजार देण्याचा निर्णय राष्ट्रीय बँक प्राधिकरणाने घेतला आहे. हे पैसे अध्यक्षांनी जमा केलेल्या जमानतीसाठीच्या ५० लाख रुपयांतून अदा करण्यात येत असून, सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर साखर सहसंचालक विभागामार्फत टाकण्यास  सुरुवात झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला दिल्यासंदर्भातील पावत्या तपासण्यात येत आहेत. त्यानुसार पैसे देण्यात येणार असल्याचेही विभागीय कार्यालयातून सांगण्यात आले.

रेकॉर्ड नव्याने तयार सदर कारखान्याकडे किंवा प्रशासनाकडे थकीत बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही  रेकॉर्ड नव्हते. नव्याने रेकॉर्ड तयार केले. त्यानुसार ४५९ शेतकऱ्यांनी आपला ऊस गेला व पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी करून पुरावे सादर केले होते.  या सर्वांची खातरजमा करून शेतकऱ्यांच्या वारसदारांचे अर्ज प्राप्त झाले. त्यांना वारस असल्याचा पुरावा देण्यासंदर्भात कळविले आहे. त्यानुसार रक्कम देण्यात येईल, अशी माहिती नांदेडच्या प्रादेशिक साखर विभागाचे बी.एल. वांगे यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडSugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा