शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विद्यार्थ्यांनी केला पाहुण्यांकडेच मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:30 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़पळशी येथील विवेकानंद विद्यालयात सेमी इंग्लिश हा अभ्यासक्रम असल्यामुळे हदगावच्या सीमेवरील अनेक गावांतील विद्यार्थ्यांनी तिथे प्रवेश घेतला आहे़ दररोज हदगाव तालुक्यातील जवळपास ९० विद्यार्थी पैनगंगेचे पात्र ओलांडून पळशी येथील शाळेत जातात़सध्या पाऊस सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून शाळेत येवू नये, असे आवाहन शाळेच्या शिक्षकांनी केले आहे़ त्यामुळे जोपर्यंत नदीपात्रातील पाणीपातळी कमी होत नाही़ तोपर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेला सुटीच घ्यावी लागते़ तर काही विद्यार्थी त्यानंतरही जीव धोक्यात घालून शाळेत येतात़ शनिवारी माटाळगा येथील तीन विद्यार्थी नदीपात्रातील कंबरेपर्यंतच्या पाण्यातून शाळेत आले़ परंतु सायंकाळी नदीचे पाणी वाढल्यामुळे त्यांना परत आपल्या गावी जाण्याची पंचाईत झाली़ त्यानंतर शिक्षकांनी त्या मुलांचे नातेवाईक असलेल्या कुपटी, पळशी येथे नेवून सोडले़ या विद्यार्थ्यांना रात्रभर नातेवाईकांकडेच मुक्काम करावा लागला़नातेवाईकांकडे सोडण्याची जबाबदारीही शाळेतील शिक्षकांवरच येवून पडते़ पावसाळ्यात निर्माण झालेल्या या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून पाणी कमी होत नाही, तोपर्यंत हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत़मुख्यमंत्र्यांना दिले निवेदनमुख्याध्यापक राजकुमार पेंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोबाईलवर या प्रकाराबाबत माहिती पाठविली होती़ तसेच त्यांना ई-मेलसुद्धा केला आहे़ पिंपरी येथील ओढा ओलांडता येत नसल्यामुळे या ठिकाणी फक्त ३० फुटांचा रस्ता करुन दिल्यास अनेक विद्यार्थ्यांची सोय होणार आहे़ त्याचबरोबर माटाळगा आणि मनुला येथील विद्यार्थ्यांसाठी ५०० मीटरचा रस्ता केल्यास ही समस्या दूर होणार आहे, असेही मुख्याध्यापक पेंदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे़

टॅग्स :RainपाऊसStudentविद्यार्थी