शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

विद्यार्थ्यांनी केला पाहुण्यांकडेच मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:30 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़पळशी येथील विवेकानंद विद्यालयात सेमी इंग्लिश हा अभ्यासक्रम असल्यामुळे हदगावच्या सीमेवरील अनेक गावांतील विद्यार्थ्यांनी तिथे प्रवेश घेतला आहे़ दररोज हदगाव तालुक्यातील जवळपास ९० विद्यार्थी पैनगंगेचे पात्र ओलांडून पळशी येथील शाळेत जातात़सध्या पाऊस सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून शाळेत येवू नये, असे आवाहन शाळेच्या शिक्षकांनी केले आहे़ त्यामुळे जोपर्यंत नदीपात्रातील पाणीपातळी कमी होत नाही़ तोपर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेला सुटीच घ्यावी लागते़ तर काही विद्यार्थी त्यानंतरही जीव धोक्यात घालून शाळेत येतात़ शनिवारी माटाळगा येथील तीन विद्यार्थी नदीपात्रातील कंबरेपर्यंतच्या पाण्यातून शाळेत आले़ परंतु सायंकाळी नदीचे पाणी वाढल्यामुळे त्यांना परत आपल्या गावी जाण्याची पंचाईत झाली़ त्यानंतर शिक्षकांनी त्या मुलांचे नातेवाईक असलेल्या कुपटी, पळशी येथे नेवून सोडले़ या विद्यार्थ्यांना रात्रभर नातेवाईकांकडेच मुक्काम करावा लागला़नातेवाईकांकडे सोडण्याची जबाबदारीही शाळेतील शिक्षकांवरच येवून पडते़ पावसाळ्यात निर्माण झालेल्या या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून पाणी कमी होत नाही, तोपर्यंत हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत़मुख्यमंत्र्यांना दिले निवेदनमुख्याध्यापक राजकुमार पेंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोबाईलवर या प्रकाराबाबत माहिती पाठविली होती़ तसेच त्यांना ई-मेलसुद्धा केला आहे़ पिंपरी येथील ओढा ओलांडता येत नसल्यामुळे या ठिकाणी फक्त ३० फुटांचा रस्ता करुन दिल्यास अनेक विद्यार्थ्यांची सोय होणार आहे़ त्याचबरोबर माटाळगा आणि मनुला येथील विद्यार्थ्यांसाठी ५०० मीटरचा रस्ता केल्यास ही समस्या दूर होणार आहे, असेही मुख्याध्यापक पेंदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे़

टॅग्स :RainपाऊसStudentविद्यार्थी