शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

नांदेड शहर स्वच्छतेसाठी जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:20 IST

शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर हा विषय मार्गी लागला आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष शहरात खाजगी कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागातून देण्यात आली.

ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्णयानंतर कामाला होणार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर हा विषय मार्गी लागला आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष शहरात खाजगी कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागातून देण्यात आली.शहर स्वच्छता निविदाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात एकदा नव्हे, तर दोनदा याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची होती. त्याखालोखाल बंगळूरच्या पी. गोपीनाथ रेड्डी यांचे दर होते. मात्र दुसqया क्रमांकाचे दर असलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी यांनी १२ डिसेंबर २०१७ आणि २९ जानेवारी २०१८ अशा दोन वेळा औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेचा अंतिम निकाल १४ फेब्रुवारी रोजी लागला. त्यामध्ये महापालिकेच्या निविदा प्रक्रियेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. महापालिकेची प्रक्रिया योग्य ठरविली. परिणामी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी १५ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदारास शहर स्वच्छतेच्या कामास प्रारंभ करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार सदर कंत्राटदाराकडून साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.कचºयाचे संकलन करणे, रहिवासी, निवास, हॉटेल, आठवडी बाजार, कत्तलखाना आदी ठिकाणाहून घनकचरा, रिक्षा, आॅटो, टिप्पर, ट्रॅक्टरने संकलित करणे तसेच दैनंदिन रस्ते सफाई व नालेसफाईसाठी कामगार पुरवणे ही मुख्य जबाबदारी सदर कंत्राटदाराची आहे. त्याचवेळी घनकचºयासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रस्ते सफाईतून जमा झालेला कचरा उचलून नेणे, शहर कचरामुक्त करणे, कचरा उचलणाºया सर्व गाड्यांना जीपीए सिस्टीम बसविणे व ते मनपा कार्यालयातील नियंत्रण कक्षात जोडणे, ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी सुविधा द्यावी लागणार आहे.शहरातील दैनंदिन कचरा उचलण्यासाठी व डंपिंग ग्राऊंडला टाकण्यासाठी सदर कंत्राटदारास जवळपास १७० वाहने नव्याने खरेदी करण्याचे आदेशही महापालिकेने दिले आहेत. प्रारंभी तीन महिने जुन्या वाहनांतून कचरा उचलण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र टाटा एस-९०, टाटा-४०७ टेंपो-२०, रिफ्यूज कॉम्पॅक्टर-६, जेसीबी-१, डंबर प्लेसर-२ आणि एक ट्रॅक्टर असे जवळपास १७० वाहने नव्याने खरेदी करावी लागणार आहे.या वाहनांवर ३५३ मजूरही ठेकेदाराला उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. शहरातून उचलणारा प्रतिटन कचरा हा १६३१ रुपये दराने उचलला जाणार आहे.