शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सोयाबिनवर रोग पडलाय; चिंता नको, मदतीसाठी नांदेड जिल्ह्याने मागितले ७९ कोटी

By प्रसाद आर्वीकर | Updated: November 30, 2023 15:38 IST

रोगाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष किती नुकसान आहे, याची तपासणी कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

नांदेड : पिवळ्या मोझॅक या विषाणूजन्य रोगाने ९३ हजार ६८६ हेक्टरवरील सोयाबीनचे बाधित झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ७९ कोटी ६३ लाख रुपयांची मागणी महसूल प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे.

सोयाबीन हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. यावर्षीच्या खरीपात शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यात सोयाबीनचे नुकसान झाले. जे पीक बचावले होते त्या पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कंधार, लोहा, नांदेड, नायगाव या तालुक्यांमधील सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग पडला होता. त्याचप्रमाणे खोडकुज आणि मुळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक भागात सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट निर्माण झाली आहे. प्रादुर्भावग्रस्त पिकांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

रोगाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष किती नुकसान आहे, याची तपासणी कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. पिवळा मोझॅक आणि खोडकूज, मुळकुज या तीनही रोगांमुळे ९३ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक बाधित झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ६३ लाख ३१ हजार रुपये निधी लागणार असून त्याची मागणी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. पिवळा मोझॅक व बुरशीजन्य रोगांमुळे बाधित झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रशासनाच्या या मदतीची प्रतीक्षा लागली आहे.

कंधार लोहामध्ये सर्वाधिक नुकसानकंधार तालुक्यातील १२३ गावांमध्ये सोयाबीनचे पीक प्रादुर्भावग्रस्त झाले आहे. २३ हजार ४०० हेक्टर क्षेत्र बाधित म्हणून प्रशासनाने नोंद घेतली आहे. तर लोहा तालुक्यातील १२६ गावांमध्ये ४४ हजार २२४ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन प्रादुर्भावग्रस्त झाले आहे.

दोन लाख ११ हजार शेतकऱ्यांना फटकासोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कंधार तालुक्यातील ३७ हजार ६००, लोहा तालुक्यात ७२ हजार, नांदेड २६ हजार ८४०, मुदखेड २१ हजार ८२ आणि नायगाव तालुक्यात ५३ हजार ९२७ अशा २ लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या मदतीची मागणी प्रशासनाने नोंदविली आहे.

कोणत्या तालुक्यासाठी किती मागितला निधी?कंधार: १९.८९लोहा: ३७.५९नांदेड: ०३.९८नायगाव: ०३.०२( निधी कोटीत )

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड