शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे मोदी आता थापा मारणार नाहीत; रामदास आठवलेंचा हळूच चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 15:59 IST

सत्तेवर येताच ते आश्वासनांची पूर्तता करतील

नांदेड : पंतप्रधान मोदी  यांनी सत्तेवर येताना जी आश्वासने दिली आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी त्यांना लागणार आहे़ त्यामुळे पुन्हा सत्तेवर येताच ते आश्वासनांची पूर्तता करतील ते पुन्हा थापा मारणार नाहीत असे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका प्रश्नांवर बोलताना म्हटले. ते नांदेड येथे दुष्काळी परिस्थीचा आढावा घेण्यासाठी आले आहेत. 

शनिवारी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण असल्याचे सांगताना राज्य सरकार उपाययोजना करीत असल्याचे सांगितले़ यासाठी केंद्राकडूनही मदत केली जात आहे़ त्याचवेळी दुष्काळ निवारणासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याची गरज आहे़ नव्या उद्योगांची उभारणी करावी तसेच शेतीला जोडधंदाही आवश्यक असल्याचे ते म्हणाले़ 

तसेच राज्याला दुष्काळ निवारणासाठी दोन हजार कोटींचा निधी केंद्र सरकारने दिल्याचे टिष्ट्वट मुख्यमंत्र्यांनी केले होते, प्रत्यक्षात ही मदत मिळालीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ याबाबत मुख्यमंत्रीही मोदींच्या पावलावर पाऊल टाकत आहेत काय असे विचारले असता त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर येताना जी आश्वासने दिली आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे़ त्यामुळे पुन्हा सत्तेवर येताच ते आश्वासनांची पूर्तता करतील ते पुन्हा थापा मारणार नाहीत असे म्हटले. यासोबतच राजकीय वाटचालीबाबत बोलताना आठवले यांनी मी ज्यांना पाठींबा देतो त्यांचीच सत्ता येते़ माझा पाठींबा आता भाजपाला असून देशात पुन्हा भाजपाची सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडRamdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदी